शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६० टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:38 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. बुलडाणा जिल्ह्यातील धरणात अद्यापही अल्प जलसाठा आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.वऱ्हाडातील अकोला , बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. ...

ठळक मुद्देया सर्व धरणांमध्ये ३० आॅगस्ट रोजी ५९.०२८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे.अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८८.२५ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. बुलडाणा जिल्ह्यातील धरणात अद्यापही अल्प जलसाठा आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ३० आॅगस्ट रोजी ५९.०२८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८८.२५ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. हा साठा ९५ टक्केपर्यंत पोहोचल्यास विसर्ग करावा लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४९.७१ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८६.७८ टक्के जलसाठा संकलित आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.३२, तर उतावळी धरणातील पातळी ३५.८३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १७.३१ टक्के, पेनटाकळी धरणात १७.११ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.९८ टक्के, पलढगमध्ये २५.५७ टक्के, मन धरणात २४.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९२ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे. एकूणच बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अद्याप सुधारली नाही.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४७.३२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील १०० पूसमध्ये, अरुणावती ९१.५९ तर बेंबळा धरणात ६०.७७ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण