शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
5
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
6
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
7
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
8
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
9
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
10
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
11
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
12
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
13
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
14
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
15
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
16
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
17
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
18
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
19
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
20
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?

वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 10:41 IST

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे.

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. आमच्याकडे काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्याकडून आघाडीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही तसेच एमआयएमने १०० जागा मागितल्याचे पत्रही मिळाले नाही, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडी पार्लेमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.अकोल्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला पार्लेर्मेंटरी बोर्डाचे सदस्य व प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, रेखा ठाकूर, आमदार बळीराम सिरस्कार, प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोंडे आदी उपस्थित होते.अण्णराव पाटील म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत घेतलेली मते लक्षात घेता येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेचा भाग असू हा विश्वास निर्माण झाला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, सोमवारी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयएमने १०० जागा मागितल्या असल्या संदर्भात विचारणा केली असता असे कोणतेही पत्र एमआयएमकडून आलेले नाही, असा खुलासा करतानाच एमआयएम हा आमचा घटक पक्ष असून, त्यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा सुरळीत होईल. कुठलाही वाद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोणत्याही पक्षाने आघाडीसाठी आमच्याकडे प्रस्ताव दिलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्ष सोबत येतील तर आनंदच आहे; मात्र त्यासाठी आम्ही आमच्या धोरणांना आणि स्वाभिमानाला सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...तरच काँग्रेससोबत आघाडीकाँग्रेसच्या नेत्यांची आघाडीसंदर्भातील विधाने ही फक्त माध्यमांमध्येच आहेत. काँग्रेसला आघाडी करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी आम्ही भाजपाची ‘बी टीम’ कसे आहोत हे सिद्ध करावे अन्यथा आम्हाला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांची माफी मागावी. नंतरच आघाडीचा प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. लक्ष्मण मानेंसोबत मनभेद नाहीतलक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीवर केलेली टीका ही मतभेदाचा प्रकार आहे. संघटनेत मतभेद असू शकतात; मात्र त्यांच्यासोबत आमचे मनभेद नाहीत. काँग्रेससोबत आघाडी करावी ही त्यांची सूचना चांगली आहे; मात्र त्यासाठी स्वाभिमान सोडून काँग्रेससोबत जाणे कदापि मान्य नाही. सूचना करणे, मत मांडणे हे योग्यच आहे; मात्र त्यासाठी आग्रह धरणे चुकीचे असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणAkolaअकोला