शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 10:41 IST

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे.

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. आमच्याकडे काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्याकडून आघाडीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही तसेच एमआयएमने १०० जागा मागितल्याचे पत्रही मिळाले नाही, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडी पार्लेमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.अकोल्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला पार्लेर्मेंटरी बोर्डाचे सदस्य व प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, रेखा ठाकूर, आमदार बळीराम सिरस्कार, प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोंडे आदी उपस्थित होते.अण्णराव पाटील म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत घेतलेली मते लक्षात घेता येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेचा भाग असू हा विश्वास निर्माण झाला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, सोमवारी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयएमने १०० जागा मागितल्या असल्या संदर्भात विचारणा केली असता असे कोणतेही पत्र एमआयएमकडून आलेले नाही, असा खुलासा करतानाच एमआयएम हा आमचा घटक पक्ष असून, त्यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा सुरळीत होईल. कुठलाही वाद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोणत्याही पक्षाने आघाडीसाठी आमच्याकडे प्रस्ताव दिलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्ष सोबत येतील तर आनंदच आहे; मात्र त्यासाठी आम्ही आमच्या धोरणांना आणि स्वाभिमानाला सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...तरच काँग्रेससोबत आघाडीकाँग्रेसच्या नेत्यांची आघाडीसंदर्भातील विधाने ही फक्त माध्यमांमध्येच आहेत. काँग्रेसला आघाडी करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी आम्ही भाजपाची ‘बी टीम’ कसे आहोत हे सिद्ध करावे अन्यथा आम्हाला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांची माफी मागावी. नंतरच आघाडीचा प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. लक्ष्मण मानेंसोबत मनभेद नाहीतलक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीवर केलेली टीका ही मतभेदाचा प्रकार आहे. संघटनेत मतभेद असू शकतात; मात्र त्यांच्यासोबत आमचे मनभेद नाहीत. काँग्रेससोबत आघाडी करावी ही त्यांची सूचना चांगली आहे; मात्र त्यासाठी स्वाभिमान सोडून काँग्रेससोबत जाणे कदापि मान्य नाही. सूचना करणे, मत मांडणे हे योग्यच आहे; मात्र त्यासाठी आग्रह धरणे चुकीचे असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणAkolaअकोला