शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

वंचित बहुजन आघाडी : नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:28 IST

आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला : अलीकडच्या राजकारणात 'सोशल इंजिनिअरिंग' हा परवलीचा शब्द झाला आहे; मात्र महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात याच 'सोशल इंजिनिअरिंग'च्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी. याच प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात 'अकोला पॅटर्न' या नावाने झाली. १९९० ते २००४ पर्यंत याच अकोला 'पॅटर्न'ने आपला सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. या अकोला पॅटर्नचे राजकीय नाव होते 'भारिप-बहुजन महासंघ' आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही. वंचित बहुजन आघाडी या नावाने भारिप-बमसंचा पुढचा राजकीय प्रवास असेल, अशी घोषणाच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे राजकीय पटलावरून भारिप-बमसंची ओळख मिटली जाणार आहे.१८८४ ला भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोल्यात राजकीय कारकीर्द सुरू केली. अकोल्यात मराठा समाजाचे असलेले प्राबल्य, शिवसेनेचा अकोल्यात सुरू झालेला झंझावात, या पृष्ठभूमीवर मखराम पवार यांना सोबत घेऊन त्यांनी बहुजन महासंघ स्थापन केला. १९९३ च्या नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत भीमराव केराम हे आमदार झाले व पुढे भारिप-बमसं हे समीकरणच झाले. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांना लंकेश्वर गुरुजी, बी.आर. शिरसाट, दिलीप तायडे, प्राचार्य सुभाष पटनायक असे कार्यकर्ते मिळालेत. या कार्यकर्त्यांनी ही चळवळ आणि पक्ष तळागाळात रुजवला अन् मोठाही केला. १९८९ ते १९९६ या तीन लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या पक्षाला मात्र अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश अनुभवता आले. स्वत: बाळासाहेब १९९७ आणि ९८ असे दोन वेळा खासदार म्हणून विजयी झालेत. तर डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे अशांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कारांना आमदार म्हणून मिरवता आले. श्रावण इंगळे, बालमुकुंद, भिरड, साबिया अंजूम सौदागर, पुष्पा इंगळे, शरद गवई, संध्या वाघोडे यांच्यासारख्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपभोगता आले. तर अकोल्याबाहेर भीमराव केराम यांच्यासह, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी असे आमदारही त्यांनी निवडून आणले. या पृष्ठभूमीवर जून २०१८ मध्ये त्यांनी पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीची घोषणा करून नव्या राजकीय डावाला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या पराभवात निर्णायक ठरणारी मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीकडे वळविण्यासाठी आता त्यांनी एमआयएमचीही साथ घेतली असून, भविष्यातील राजकारण हे याच आघाडीच्या माध्यमातून होणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे भारिप-बमसं हा परवलीचा शब्द आता राजकीय पटलावरून पुसल्या जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा राजकीय डाव फसला तर बाळासाहेबांचा आणखी एक प्रयोग, अशी राजकारणात नोंद होईल; मात्र तो यशस्वी झाला तर नव्या पर्वाची सुरुवात होईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे वंचित बहुजन आघाडीच्या भविष्याचा निर्णय करणारे असतील एवढे निश्चित.

 

टॅग्स :AkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर