शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वंचित बहुजन आघाडी : नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:28 IST

आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला : अलीकडच्या राजकारणात 'सोशल इंजिनिअरिंग' हा परवलीचा शब्द झाला आहे; मात्र महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात याच 'सोशल इंजिनिअरिंग'च्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी. याच प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात 'अकोला पॅटर्न' या नावाने झाली. १९९० ते २००४ पर्यंत याच अकोला 'पॅटर्न'ने आपला सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. या अकोला पॅटर्नचे राजकीय नाव होते 'भारिप-बहुजन महासंघ' आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही. वंचित बहुजन आघाडी या नावाने भारिप-बमसंचा पुढचा राजकीय प्रवास असेल, अशी घोषणाच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे राजकीय पटलावरून भारिप-बमसंची ओळख मिटली जाणार आहे.१८८४ ला भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोल्यात राजकीय कारकीर्द सुरू केली. अकोल्यात मराठा समाजाचे असलेले प्राबल्य, शिवसेनेचा अकोल्यात सुरू झालेला झंझावात, या पृष्ठभूमीवर मखराम पवार यांना सोबत घेऊन त्यांनी बहुजन महासंघ स्थापन केला. १९९३ च्या नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत भीमराव केराम हे आमदार झाले व पुढे भारिप-बमसं हे समीकरणच झाले. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांना लंकेश्वर गुरुजी, बी.आर. शिरसाट, दिलीप तायडे, प्राचार्य सुभाष पटनायक असे कार्यकर्ते मिळालेत. या कार्यकर्त्यांनी ही चळवळ आणि पक्ष तळागाळात रुजवला अन् मोठाही केला. १९८९ ते १९९६ या तीन लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या पक्षाला मात्र अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश अनुभवता आले. स्वत: बाळासाहेब १९९७ आणि ९८ असे दोन वेळा खासदार म्हणून विजयी झालेत. तर डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे अशांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कारांना आमदार म्हणून मिरवता आले. श्रावण इंगळे, बालमुकुंद, भिरड, साबिया अंजूम सौदागर, पुष्पा इंगळे, शरद गवई, संध्या वाघोडे यांच्यासारख्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपभोगता आले. तर अकोल्याबाहेर भीमराव केराम यांच्यासह, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी असे आमदारही त्यांनी निवडून आणले. या पृष्ठभूमीवर जून २०१८ मध्ये त्यांनी पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीची घोषणा करून नव्या राजकीय डावाला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या पराभवात निर्णायक ठरणारी मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीकडे वळविण्यासाठी आता त्यांनी एमआयएमचीही साथ घेतली असून, भविष्यातील राजकारण हे याच आघाडीच्या माध्यमातून होणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे भारिप-बमसं हा परवलीचा शब्द आता राजकीय पटलावरून पुसल्या जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा राजकीय डाव फसला तर बाळासाहेबांचा आणखी एक प्रयोग, अशी राजकारणात नोंद होईल; मात्र तो यशस्वी झाला तर नव्या पर्वाची सुरुवात होईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे वंचित बहुजन आघाडीच्या भविष्याचा निर्णय करणारे असतील एवढे निश्चित.

 

टॅग्स :AkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर