शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

आदिवासी भागात लस पोहोचलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचली असल्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा फ़ोल ठरत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासीबहुल ...

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचली असल्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा फ़ोल ठरत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात अद्यापही लस पोहोचली नसल्यामुळे आदिवासी नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समाेर आली आहे़ दरम्यान, आदिवासीबहुल भागात लस उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे शिबिराचे आयाेजन करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.

संसर्गजन्य काेराेना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे काेराेना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली आहे़ लसीचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे़ शहरी भागात किंवा तालुका स्तरावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे़ दुसरीकडे पश्चिम विदर्भातील आदिवासीबहुल भागात अद्यापपर्यंतही लसीकरणापासून आदिवासी बांधव वंचित असल्याचे समाेर आले आहे़ अकाेला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात लसीकरण केंद्र सुरु न केल्यामुळे संबंधित नागरिकांना खडतर प्रवास करून किमान २० ते २५ किमी अंतरावरील प्राथमिक आराेग्य केंद्रांत जावे लागत आहे़ त्या ठिकाणी जाईपर्यंत लसीचा साठा संपल्याचे कारण समाेर केले जात आहे़ ही बाब पाहता आराेग्य यंत्रणेने आदिवासी भागातच लसीकरण केंद्र सुरु करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे़

हा भाग आदिवासीबहुल

अकाेला जिल्ह्यात पातूर, अकाेट, वाशिम जिल्ह्यात मानाेरा, मालेगाव तसेच बुलडाणा जिल्ह्यात मेहकर, जळगाव जामाेद व संग्रामपूर तालुका आदिवासीबहुल भाग आहे़ या भागातील दुर्गम,अतिदुर्गम व डाेंगराळ भागात दळवळणाच्या सुविधा नसल्यामुळे स्थानिकांना लस घेण्यासाठी वाट तुडवत प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये यावे लागत आहे़

आदिवासीबहुल भागात तसेच शासकीय आदिवासी आश्रम शाळा, वसतिगृहांमध्ये लसीकरणासाठी शिबिराचे आयाेजन करण्याची मागणी पत्राद्वारे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेकडे केली आहे़ लस घेण्याबाबत आदिवासींमध्ये जनजागृती केली जात आहे़ परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे जनजागृती करताना कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे़

-राजेंद्र हिवराळे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग अकाेला