शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

माळेगाव येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

------------ भांबेरी येथे १७३ जणांना लस भांबेरी: येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ...

------------

भांबेरी येथे १७३ जणांना लस

भांबेरी: येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १७३ जणांना लस देण्यात आली. यावेळी डॉ.गवई, ढवळे, वागोळे, शरद वाघ आदींनी परिश्रम घेतले.

------------

वाहाळा येथे वीज तार तुटल्या!

वाहाळा बु: पातुर तालुक्यातील वाहाळा बु. येथे अचानक पावसाचे आगमन झाले असता, वादळी वाऱ्यामुळे विजेचा तार तुटून पडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वीज तारा तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

------------------

दहावीचा निकालाबाबत विद्यार्थी संभ्रमात!

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दहावीचा निकाल कसा लागेल, त्याचे सूत्र कसे असेल आदी प्रश्न उपस्थित झाले होते.

-------------------------

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल!

तेल्हारा : परिसरात पेरणीस सुरुवात झाली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने या वर्षी शेतकऱ्यांचा कल शेणखताकडे वाढला आहे. बियाण्यांचे दरही वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेणखताचे भावही वाढल्याचे चित्र आहे.

-------------------------

बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

बाळापूर: तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. पेरणी सुरू हाेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

------------------------

जिल्ह्यात गुरांचे लसीकरण रखडले!

अकोला: कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी आदी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यांत हे लसीकरण केले जाते.

------------------------

शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा!

पातूर: सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी हाेत आहे. लसीकरणाचा वेग वाढविल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे. दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.

------------------------------

वीजपुरवठा वारंवार खंडित; ग्रामस्थ त्रस्त

खेट्री : सस्ती येथील उपकेंद्राचा कारभार वाऱ्यावर असल्याने, परिसरातील गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-----------------------------