शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

माळेगाव येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

------------ भांबेरी येथे १७३ जणांना लस भांबेरी: येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ...

------------

भांबेरी येथे १७३ जणांना लस

भांबेरी: येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १७३ जणांना लस देण्यात आली. यावेळी डॉ.गवई, ढवळे, वागोळे, शरद वाघ आदींनी परिश्रम घेतले.

------------

वाहाळा येथे वीज तार तुटल्या!

वाहाळा बु: पातुर तालुक्यातील वाहाळा बु. येथे अचानक पावसाचे आगमन झाले असता, वादळी वाऱ्यामुळे विजेचा तार तुटून पडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वीज तारा तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

------------------

दहावीचा निकालाबाबत विद्यार्थी संभ्रमात!

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दहावीचा निकाल कसा लागेल, त्याचे सूत्र कसे असेल आदी प्रश्न उपस्थित झाले होते.

-------------------------

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल!

तेल्हारा : परिसरात पेरणीस सुरुवात झाली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने या वर्षी शेतकऱ्यांचा कल शेणखताकडे वाढला आहे. बियाण्यांचे दरही वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेणखताचे भावही वाढल्याचे चित्र आहे.

-------------------------

बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

बाळापूर: तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. पेरणी सुरू हाेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

------------------------

जिल्ह्यात गुरांचे लसीकरण रखडले!

अकोला: कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी आदी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यांत हे लसीकरण केले जाते.

------------------------

शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा!

पातूर: सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी हाेत आहे. लसीकरणाचा वेग वाढविल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे. दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.

------------------------------

वीजपुरवठा वारंवार खंडित; ग्रामस्थ त्रस्त

खेट्री : सस्ती येथील उपकेंद्राचा कारभार वाऱ्यावर असल्याने, परिसरातील गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-----------------------------