शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सोशल मीडियाचा वापर तुमचा दृष्टिकोन, कृती आणि प्रवृत्तीवर अवलंबून!

By admin | Updated: February 16, 2016 01:39 IST

ग्रंथोत्सवातील परिसंवादात चर्चा.

अकोला: सोशल मीडियाचा वापर वाढत असताना, वाचनसंस्कृतीवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचं लक्षात येतं. सोशल मीडिया हे स्वत:चं मत मांडण्याचं एक माध्यम झालं आहे. तो चांगला की वाईट, हा आपआपला दृष्टिकोन आहे. त्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हायला हवा. सोशल मीडिया ज्ञानपूर्ण माहितीचं चांगलं दालन आहे; परंतु त्यावर कितपत विश्‍वास ठेवावा, याचाही विचार करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया मनोरंजनाचे साधन बनले आहे. त्याचा ज्ञान संपादन करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात सोमवारी दुपारी ३.३0 वाजता ह्यसोशल मीडिया वाचनसंस्कृतीला पोषक?ह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी तथा लेखक शरद पाटील होते. विचारपीठावर विदर्भ साहित्य संघाचे कोषाध्यक्ष डॉ. गजानन नारे, लेखिका प्रतिमा इंगोले, पत्रकार सचिन काटे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहूरवाघ, जिल्हा ग्रंथपाल सोपान सातभाई उपस्थित होते. परिसंवादामध्ये सोशल मीडिया वाचनसंस्कृतीस पोषक आहे की नाही, यावर चर्चा करण्यात आली. डॉ. गजानन नारे म्हणाले, सोशल मीडिया या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळते; परंतु त्यावर कितपत विश्‍वास ठेवावा, याचाही विचार केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगला, तेवढेच दुरुपयोगही आहेत. ज्ञानाचं साधन मनोरंजनाचं साधन बनलं आहे. घरातील संवाद हरवत चाललाय. सोशल मीडियाचा चांगला-वाईट कसा वापर करून घ्यायचा, हे आपल्या हातात आहे, असे सांगत डॉ. नारे यांनी सोशल मीडियामुळे वाचनसंस्कृती धोक्यात आल्याचे म्हणता येणार नाही, असे मत व्यक्त केले. पत्रकार सचिन काटे म्हणाले, वाचनसंस्कृती कमी झाल्याबाबतच अद्यापपर्यंत एकमत झालेलं नाही. सोशल मीडियाबाबत विश्‍वासार्हता कितपत आहे, याचा विचार केला पाहिजे. आज देशातील ३0 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. सोशल मीडियाचे फायदे आहेत आणि दुष्परिणामही, असे मत त्यांनी व्यक्त केले.