शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

‘जलकुं भी’ नियंत्रणासाठी किडींचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:27 IST

अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

ठळक मुद्देफ्लोरिडा, ऑस्ट्रेलियातून किडींची आयात; विज्ञान केंद्रात संशोधन

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.जलकुंभीचं मूळ ब्राझील आहे.  ही युरोप वगळता सर्व जगात पसरली. भारतात, एकोणावीसशेच्या दशकात सर्वप्रथम कोलकोता येथे फुलांचे झाड म्हणून आणलेल्या या तणवर्गीय वनस्पतीचा देशात विस्तार झाला. पाण्यातील प्राणवायू आणि जलचर प्राण्यांसाठी घातक ठरणारी ही जलकुंभी आता डोकेदुखी ठरू  लागल्याने या तणाच्या नियंत्रणासाठी १९८२ मध्ये फ्लोरीडा आणि आस्ट्रेलियातून नियोकोटीना आणि नि. बुकी (कोलीयोप्टरा, कुरकुलीयोनीडी)या दोन जातीच्या किडींची बंगरू ळ येथे आयात करण्यात आली . १९८५ मध्ये या माइट प्रजातींना बाहेरच्या वातावरणात सोडण्याची अनुमती देण्यात आली. या किडींनी जलकुंभीवर  जैविकरीत्या नियंत्रण मिळविले आहे. या अगोदर आस्ट्रेलिया, अमेरिका व सुडान या देशात सोडण्यात आलेल्या ‘माइट’ ने जलकुंभीवर नियंत्रण मिळविले. ही कीड पाने कुरतळून खाते.उष्णकटीबंधीय देशात स्वतंत्रपणे पाण्यात तरंगणारी ही तणवर्गीय वनस्पती आहे.‘आइकोर्निया क्रेसीपस’ वैज्ञानिक नाव असलेल्या वनस्पतीला हिंदी व प्रादेशिक भाषेत जलकुं भी, पटपटा व समुद्र सोख या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायू कमी होत असून, मासे व इतर जलचर प्राण्यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. २0 ते ४0 टक्के पाण्याचा प्रवाह यामुळे कमी होतो. बाष्पिभवनाचा वेगही ३ ते ८ टक्के वाढल्याचे निष्कर्ष संशोधनात समोर आले आहेत. या पृष्ठभूमीवर जबलपूर येथील विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर सात ते आठ वर्षांपूर्वी तेथील जलाशयात या किडींना सोडण्यात आले होते. आता या  किडींनी पूर्ण जलकु ंभीवर नियंत्रण मिळविले, तसेच मणिपूर, बंगरू ळू आणि हैद्राबाद आदी शहरातील जलकुंभी या किडींद्वारे नियंत्रित करण्यात आली.

उत्पादनाची क्षमता जलद जलकुंभीचे एक झाड पाच पाच हजार बियाणे निर्माण करते. हे बियाणे मातीत अनेक वर्ष दबून राहतात. अनुकूल परिस्थिती निर्माण होताच पुन्हा डोके वर काढतात. मूळ झाडापासून तुटलेल्या फांदय़ा दुसरे झाड तयार करतात. १0 ते १२ दिवसात जलकुंभींची संख्या दुप्पट होते.

रासायनिक फवारणी२-४ डी, ग्लाईफोसेट व पेराक्वाट या रासायनिक औषधांद्वारे फवारणी करू नही जलकुंभीवर नियंत्रण मिळवता येते; परंतु आपल्याकडे फवारणी महागडी असल्याने ते शक्य नाही.

जलकुंभीवर कीड प्रभावी नियंत्रण मिळवत असून, देशात सर्वत्र वापर होत आहे.- डॉ. सुशीलकुमार,वरिष्ठ शास्त्रज्ञ,राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान संशोधन केंद्र, जबलपूर,(एम.पी.).

टॅग्स :Akola cityअकोला शहर