शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

‘जलकुं भी’ नियंत्रणासाठी किडींचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:27 IST

अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

ठळक मुद्देफ्लोरिडा, ऑस्ट्रेलियातून किडींची आयात; विज्ञान केंद्रात संशोधन

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.जलकुंभीचं मूळ ब्राझील आहे.  ही युरोप वगळता सर्व जगात पसरली. भारतात, एकोणावीसशेच्या दशकात सर्वप्रथम कोलकोता येथे फुलांचे झाड म्हणून आणलेल्या या तणवर्गीय वनस्पतीचा देशात विस्तार झाला. पाण्यातील प्राणवायू आणि जलचर प्राण्यांसाठी घातक ठरणारी ही जलकुंभी आता डोकेदुखी ठरू  लागल्याने या तणाच्या नियंत्रणासाठी १९८२ मध्ये फ्लोरीडा आणि आस्ट्रेलियातून नियोकोटीना आणि नि. बुकी (कोलीयोप्टरा, कुरकुलीयोनीडी)या दोन जातीच्या किडींची बंगरू ळ येथे आयात करण्यात आली . १९८५ मध्ये या माइट प्रजातींना बाहेरच्या वातावरणात सोडण्याची अनुमती देण्यात आली. या किडींनी जलकुंभीवर  जैविकरीत्या नियंत्रण मिळविले आहे. या अगोदर आस्ट्रेलिया, अमेरिका व सुडान या देशात सोडण्यात आलेल्या ‘माइट’ ने जलकुंभीवर नियंत्रण मिळविले. ही कीड पाने कुरतळून खाते.उष्णकटीबंधीय देशात स्वतंत्रपणे पाण्यात तरंगणारी ही तणवर्गीय वनस्पती आहे.‘आइकोर्निया क्रेसीपस’ वैज्ञानिक नाव असलेल्या वनस्पतीला हिंदी व प्रादेशिक भाषेत जलकुं भी, पटपटा व समुद्र सोख या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायू कमी होत असून, मासे व इतर जलचर प्राण्यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. २0 ते ४0 टक्के पाण्याचा प्रवाह यामुळे कमी होतो. बाष्पिभवनाचा वेगही ३ ते ८ टक्के वाढल्याचे निष्कर्ष संशोधनात समोर आले आहेत. या पृष्ठभूमीवर जबलपूर येथील विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर सात ते आठ वर्षांपूर्वी तेथील जलाशयात या किडींना सोडण्यात आले होते. आता या  किडींनी पूर्ण जलकु ंभीवर नियंत्रण मिळविले, तसेच मणिपूर, बंगरू ळू आणि हैद्राबाद आदी शहरातील जलकुंभी या किडींद्वारे नियंत्रित करण्यात आली.

उत्पादनाची क्षमता जलद जलकुंभीचे एक झाड पाच पाच हजार बियाणे निर्माण करते. हे बियाणे मातीत अनेक वर्ष दबून राहतात. अनुकूल परिस्थिती निर्माण होताच पुन्हा डोके वर काढतात. मूळ झाडापासून तुटलेल्या फांदय़ा दुसरे झाड तयार करतात. १0 ते १२ दिवसात जलकुंभींची संख्या दुप्पट होते.

रासायनिक फवारणी२-४ डी, ग्लाईफोसेट व पेराक्वाट या रासायनिक औषधांद्वारे फवारणी करू नही जलकुंभीवर नियंत्रण मिळवता येते; परंतु आपल्याकडे फवारणी महागडी असल्याने ते शक्य नाही.

जलकुंभीवर कीड प्रभावी नियंत्रण मिळवत असून, देशात सर्वत्र वापर होत आहे.- डॉ. सुशीलकुमार,वरिष्ठ शास्त्रज्ञ,राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान संशोधन केंद्र, जबलपूर,(एम.पी.).

टॅग्स :Akola cityअकोला शहर