शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रासायनिक खतांचा वापर वाढला!

By admin | Updated: June 6, 2015 01:06 IST

शेतजमिनवर दुष्परिणाम; खताचा वापर योग्य प्रमाणात करण्याचा कृषीतज्ज्ञांचा सल्ला.

संतोष वानखडे/ वाशिम: शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नातून रासायनिक खतांच्या वापरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. २00७-0८ या आर्थीक वर्षात प्रति हेक्टरी १0९ किलो असलेला रासायनिक खतांचा वापर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर पोहचला आहे. खतांची अतिरिक्त ह्यमात्राह्ण जमिनीचा पोत बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. कृषीक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान व उपक्रमांचा वापर केला जात आहे. पोषक जमिनीतून भरघोष उत्पादनाचे ह्यरिझल्टह्ण येत असल्याने शेतकरी जमिनीला पोषक बनविण्यासाठी रासायनिक खतांच्या वापराकडे वळले असल्याचे दिसून येते. एका र्मयादेपर्यंत रासायनिक खतांचा वापर जमिनीसाठी पोषक ठरू शकतो. रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना माहित नसल्याने, खतांचा वापर करण्याची शेतकर्‍यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. या स्पर्धेतून खतांचा वापर झपाट्याने वाढत असल्याची साक्ष महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. खत व किटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलो ग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षीत आहे. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २00७-0८ मध्ये रासायनिक खतांचा दर हेक्टरी सरासरी वापर १0९ किलो ग्रॅम होता. २0१२-१३ या आर्थिक वर्षात प्रति हेक्टरी ११६ किलो, २0१३-१४ मध्ये ११९ किलो तर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर खतांचा वापर पोचला आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात ५४.७ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाला. २0१३-१४ मध्ये ५९.९ लाख मेट्रीक टन तर २0१४-१५ मध्ये ७६ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाल्याचे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. रासायनिक खते व किटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर औषधींचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. संभाव्य परिणाम ओळखून शेतकर्‍यांनी खतांचा वापर योग्य प्रमाणात करणे गरजेचे ठरत आहे.