शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

रासायनिक खतांचा वापर वाढला!

By admin | Updated: June 6, 2015 01:06 IST

शेतजमिनवर दुष्परिणाम; खताचा वापर योग्य प्रमाणात करण्याचा कृषीतज्ज्ञांचा सल्ला.

संतोष वानखडे/ वाशिम: शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नातून रासायनिक खतांच्या वापरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. २00७-0८ या आर्थीक वर्षात प्रति हेक्टरी १0९ किलो असलेला रासायनिक खतांचा वापर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर पोहचला आहे. खतांची अतिरिक्त ह्यमात्राह्ण जमिनीचा पोत बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. कृषीक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान व उपक्रमांचा वापर केला जात आहे. पोषक जमिनीतून भरघोष उत्पादनाचे ह्यरिझल्टह्ण येत असल्याने शेतकरी जमिनीला पोषक बनविण्यासाठी रासायनिक खतांच्या वापराकडे वळले असल्याचे दिसून येते. एका र्मयादेपर्यंत रासायनिक खतांचा वापर जमिनीसाठी पोषक ठरू शकतो. रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना माहित नसल्याने, खतांचा वापर करण्याची शेतकर्‍यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. या स्पर्धेतून खतांचा वापर झपाट्याने वाढत असल्याची साक्ष महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. खत व किटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलो ग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षीत आहे. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २00७-0८ मध्ये रासायनिक खतांचा दर हेक्टरी सरासरी वापर १0९ किलो ग्रॅम होता. २0१२-१३ या आर्थिक वर्षात प्रति हेक्टरी ११६ किलो, २0१३-१४ मध्ये ११९ किलो तर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर खतांचा वापर पोचला आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात ५४.७ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाला. २0१३-१४ मध्ये ५९.९ लाख मेट्रीक टन तर २0१४-१५ मध्ये ७६ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाल्याचे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. रासायनिक खते व किटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर औषधींचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. संभाव्य परिणाम ओळखून शेतकर्‍यांनी खतांचा वापर योग्य प्रमाणात करणे गरजेचे ठरत आहे.