शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उडीद, मुगाच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:51 IST

बोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, मळणी यासाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. यासोबतच मूग, उडिदाला भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा करण्यापेक्षा नुकसान करणारे ठरल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात व्यापार्‍यांकडून होत आहे लूट!

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, मळणी यासाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. यासोबतच मूग, उडिदाला भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा करण्यापेक्षा नुकसान करणारे ठरल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.बोरगाव वैराळे परिसरात शेतकर्‍यांनी प्रतिएकरी पेरणीपूर्व मशागतीसाठी एक हजार, बियाणे खरेदीसाठी एक हजार, पेरणीसाठी एक हजार, डवरणी दोनदा एक हजार, निंदण ५00 रुपये, दोनदा कीटकनाशक फवारणी एक हजार, पीक कापणी प्रतिएकर १५00 रुपये, मळणी प्रतिक्विंटल ५00 रुपये असा प्रतिएकराला आतापर्यंत साडेसात हजार रुपये खर्च आला असून, प्रतिएकरात मूग, उडिदाचे पीक एक क्विंटलपेक्षा जास्त झाले नाही. जे पीक झाले, तेदेखील कापणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे रंगहीन झाले व पांढर्‍या रंगाचे झाल्यामुळे विक्रीसाठी घेऊन गेल्यानंतर बाजार समितीमधील खासगी व्यापारी दोन हजार रुपये क्विंटलने मागत असल्यामुळे झालेल्या उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणे तर सोडाच, उलट शेतकर्‍यांना प्रतिएकरी पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने हमी भावाने मूग, उडीद खरेदी करणे सुरू केले असले तरी शेतात उत्पादित झालेले अत्यल्प मूग, उडीद विक्रीसाठी घेऊन जाणे लहान शेतकर्‍यांना परवडत नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खासगी व्यापारी या सर्व छोट्या-मोठय़ा शेतकर्‍यांची आर्थिक लूट करीत आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हमीभावापेक्षा कमी भावाने मूग, उडिदाची खरेदी करणार्‍या खासगी व्यापार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांचा माल आल्यानंतर त्या मालाचे सॅम्पल खरेदीदाराकडे पाठविण्यात येते व ते खरेदीदार व्यापारी शेतकर्‍यांच्या मालाचे भाव ठरवितात. यावर शासनाने ठरविलेल्या हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याबाबत कुठलेही बंधन नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते.- अरुण गावंडे अडतदार, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला

मूग, उडिदाची हमी भावापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याचा प्रकार म्हणजे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची सामूहिक लूट करण्याचा प्रकार असून, याकडे शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी निर्माण झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाची डोळेझाक म्हणजे एकप्रकारे व्यापार्‍यांना गैरप्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे आहे.- विजय पाटील संचालक सेवा सहकारी संस्था, हातरुण

मूग, उडिदाच्या पिकांमध्ये शेतकर्‍यांना प्रति एकराला पाच ते सहा हजार रुपये तोटा सहन करावा लागला व बाजारात या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत भरच पडली असल्याने मूग, उडीद पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात यावी.- सुनील वैराळे, शेतकरी