शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

येणारा काळ विदर्भातील खेळाडूंचा! - सुलक्षण कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 10:35 IST

Cricket in Vidarbha असे मत माजी रणजीपटू व मुंबई येथील प्रसिद्ध प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

अकोला : क्रिकेटमध्ये विदर्भातील खेळाडू झपाट्याने प्रगती करीत आहे. सुरुवातीच्या काळापासूनच बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यातील क्रिकेटपटू प्रगती करीत असून, नावलौकिक मिळवत आहेत. विदर्भातील क्रिकेट खेळाडूंकडे गुणवत्तेची कमी नाही त्यामुळे येणारा काळ हा विदर्भातील खेळाडू नक्की गाजविणार, असे मत माजी रणजीपटू व मुंबई येथील प्रसिद्ध प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 

अकोला व क्रिकेट याकडे कसे बघता?

अकोला व क्रिकेटचे नाते घट्ट आहे. अकोल्यातून अनेक प्रतिभावान खेळाडू रणजीमध्ये खेळलेले आहेत. येथील खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. परिसरात क्रिकेटचे अनेक हिरे दडलेले असून, त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देऊन निखारायची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

 

अकोल्यातील धावपट्टी व मैदाने कसे आहेत?

अकोल्यातील मैदानांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मैदानांची निगा राखण्याची जबाबदारी ज्या संघटनांकडे आहे, त्यांनी मैदाने साफ करणे गरजेचे आहे. चांगल्या मैदानांशिवाय उत्कृष्ट खेळाडू घडत नाही. त्यामुळे मैदाने चांगली असणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

अकोल्यात क्रिकेट प्रामुख्याने टेनिस बॉलवर खेळले जाते. त्यामुळे येथील खेळाडू लेदर बॉलवर खेळताना अडचणीत येऊ शकतात, त्यावर उपाय सुचवा.

टेनिस क्रिकेट व लेदर बॉल क्रिकेटमध्ये काहीही फरक नाही. उलट टेनिस बॉलने क्रिकेट खेळल्याने खेळाडूला लेदर बॉल क्रिकेटमध्ये फायदाच होता. विशेषत: फलंदाजांना याचा चांगला फायदा होतो.

क्रीडा क्षेत्रावर कोरोनाचा काय परिणाम झाला?

कोविड-१९ चा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये विशेषत: क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. कोविड-१९ संसर्गजन्य असल्याने अनेक खेळाडूंचा सराव बंद झाला आहे. त्याचा फिटनेसवर परिणाम झाला. स्पर्धांचे आयोजन रद्द झाल्याने त्यांच्यामधील गुणवत्तेवरही परिणाम झाला. सध्या अनलॉक प्रक्रियेत खेळाला अटी व शर्थींनुसार मंजुरी मिळाली आहे. खेळाडू हा जिद्दी व परिश्रमी असतो. तो लवकरच तयारी करू शकतो.

अकोल्यात भविष्यात स्पर्धा भरविण्यासाठी तांत्रिक, मूलभूत अडचणी कशा दूर होतील?

अकोलेकर खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कमी नाही; मात्र येथील मैदाने पाहून खूप वाईट वाटले. भविष्यात स्पर्धा भरविण्यासाठी सर्वप्रथम मैदाने चांगली करणे आवश्यक आहेत. त्यासाठी ज्या क्लबकडे जबाबदारी आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे बजावणे गरजेचे आहे.

महिला क्रिकेटसाठी काय प्रयत्न कराल?

मी अकोल्यात खूप मोठे व्हिजन घेऊन आलो आहे. विदर्भातील क्रिकेटचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. येथील खेळाडूंमध्ये खूप प्रतीभा असून, ओळखणे गरजेचे आहे. वऱ्हाडात महिला क्रिकेट फार कमी खेळले जाते. मी त्या अनुषंगाने विशेष प्रयत्न करणार असून, यासाठी मी शालेय स्पर्धा आयोजित करण्यावर भर देणार आहे.

 खेळाडूंसाठी काय सल्ला द्याल?

येणारा काळ हा विदर्भातील खेळाडूंचा आहे. त्यामुळे येथील खेळाडूंनी परिश्रम, जीद्द व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सराव ठेवणे गरजेचे आहे. जर खेळाडू हिरा असेल, तर तो नक्कीच चमकणार. मात्र त्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत