शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अकोला शहरात अवकाळी पावसाच्या सरी; शेतकऱ्यांमध्ये धास्ती, ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात

By रवी दामोदर | Updated: January 9, 2024 18:33 IST

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पारा १४ अंशावर गेला होता.

अकोला: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मंगळवार, दि.९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आगामी दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात मागील दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पारा १४ अंशावर गेला होता, परंतू आता ढगाळ वातावरणाने किमान पारा १६ ते १७ अंशावर आहे. ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तविण्यात येत असून, मंगळवारी दुपारच्या सुमारास अकोला शहरात अवकाळीच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात अचानक बदल होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पहाटे धुके, रात्री थंडीचा कडाकाजिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, पहाटेच्या सुमरास दाट धुकेही पडत आहे. याचा फटका रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा खरीप हंगामातील कपाशी, तूर पिकासह रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकाला मोठा फटका बसला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तुर काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदलघाईजिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील तुरीच्या पिकाची सोंगणीला वेग आला आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोंगणी केलेल्या तुरीची काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदलघाई सुरू आहे. त्यात कापूस वेचणीही सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी ज्यादा मजुरी देऊन तुरीची काढणी करीत असल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस