शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्यापीठे परिवर्तनाची केंद्रे व्हावी!

By admin | Updated: July 9, 2017 09:22 IST

अकोल्यात राज्यस्तरीय महाअँग्रिव्हिजन-२0१७ चे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जागतिक स्पर्धेत कृषी विद्यापीठांची जबाबदारी वाढली असून, अन्न धान्य उत्पादकतेसोबतच शेतमालाचे मूल्यवर्धन गावपातळीवरच करू न शेतकरी सुमृद्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठे कृषी परिवर्तनाची केंद्र ठरावीत, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी शनिवारी येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांतद्वारा आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महाअँग्रिव्हिजन-२0१७ च्या उद्घाटन प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या स्व. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटस्वरू लू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.आंबेकर यांनी कृषी क्षेत्राला आलेली मरगळ दूर करण्यासाठी उत्पादक, तंत्रज्ञ, शासनकर्ते आणि नियोजनकर्ते यांचे सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले. सिंगापूर येथील क्रांतीचे उदाहरण उपस्थितांना देत सामाजिक बदलासाठी राजकीय नेतृत्वावर विसंबून न राहता कर्तृत्ववान विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यावर अधिक विश्‍वास ठेवावा, असा सल्लादेखील त्यांनी या प्रसंगी दिला. कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आदींनी शेतीला अधिक फायदेशीर बनवीत नव्या पिढीतील तरुणांना शेतीकडे वळा, असा नारा देत नवे किंवा जुने कोणतेही तंत्र जे शेतीला आवश्यक आहे, त्याचा प्रचार- प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा अधिष्ठाता कृषी डॉ. विलास भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी शिक्षणातील संधी व प्रमुख उपलब्धीविषयी कृषी पदवीधरांना अवगत केले. पाचव्या अधिष्ठाता समितीच्या विविध शिफारशींनुसार आता पुढील कृषी शिक्षणाची वाटचाल होणार असून, नवीन अभ्यासक्रम अधिक प्रयोगशील तथा कृतिशील आहे, ही समाधानाची बाब आहे, असे नमूद केले.कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारूदत्त मायी यांनी कृषीपूरक उद्योगांना अधिक लोकाभिमुख करीत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांचे जाळे घट्ट करीत कायमस्वरूपी रोजगार निर्मिती साधावी व धान्योत्पादन ही प्राथमिकता तर कृषी प्रक्रिया ही त्या पुढची पायरी असल्याचे जनमनात बिंबवावे, असा सल्ला उपस्थित विद्यार्थी वर्गाला दिला. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. व्यंकटेश्‍वरुलू यांनी अशा प्रकारच्या संमेलनाची गरज अधोरेखित केली. युवकांचा देश ही आपल्या देशाला मिळालेली उपाधी शेती आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय खर्‍या अर्थाने सार्थ होणार नाही, असे सांगितले.सत्राचे प्रास्ताविक प्रांत प्रमुख प्रा. नितीन गुप्ता यांनी केले. याप्रसंगी कृषी पदवीधरांकडून प्राप्त संशोधनपर लेख असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनसुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आभार प्रदर्शन प्रांत निमंत्रक श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी कृष्णा गांगुर्डे, डॉ के. बी. पाटील, बाबासाहेब गोरे, विलास शिंदे यांच्यासह अभाविपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, प्रांत मंत्री विक्रमजित कलाने, प्रांत उपाध्यक्ष प्रा. राजू बोरकर, पंदेकृविचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची उपस्थिती होती. राज्याच्या विविध भागातून मोठय़ा संख्येने आलेले कृषी पदवीधर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संयोजन समितीचे डॉ. श्याम मुंजे, दीपिका पडोळे, डॉ. जयंत उत्तरवार, सचिन लांबे, संदीप ठेंग, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील यांच्यासह अभाविपचे अकोला महानगर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.