शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठे परिवर्तनाची केंद्रे व्हावी!

By admin | Updated: July 9, 2017 09:22 IST

अकोल्यात राज्यस्तरीय महाअँग्रिव्हिजन-२0१७ चे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जागतिक स्पर्धेत कृषी विद्यापीठांची जबाबदारी वाढली असून, अन्न धान्य उत्पादकतेसोबतच शेतमालाचे मूल्यवर्धन गावपातळीवरच करू न शेतकरी सुमृद्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठे कृषी परिवर्तनाची केंद्र ठरावीत, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी शनिवारी येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांतद्वारा आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महाअँग्रिव्हिजन-२0१७ च्या उद्घाटन प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या स्व. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटस्वरू लू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.आंबेकर यांनी कृषी क्षेत्राला आलेली मरगळ दूर करण्यासाठी उत्पादक, तंत्रज्ञ, शासनकर्ते आणि नियोजनकर्ते यांचे सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले. सिंगापूर येथील क्रांतीचे उदाहरण उपस्थितांना देत सामाजिक बदलासाठी राजकीय नेतृत्वावर विसंबून न राहता कर्तृत्ववान विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यावर अधिक विश्‍वास ठेवावा, असा सल्लादेखील त्यांनी या प्रसंगी दिला. कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आदींनी शेतीला अधिक फायदेशीर बनवीत नव्या पिढीतील तरुणांना शेतीकडे वळा, असा नारा देत नवे किंवा जुने कोणतेही तंत्र जे शेतीला आवश्यक आहे, त्याचा प्रचार- प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा अधिष्ठाता कृषी डॉ. विलास भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी शिक्षणातील संधी व प्रमुख उपलब्धीविषयी कृषी पदवीधरांना अवगत केले. पाचव्या अधिष्ठाता समितीच्या विविध शिफारशींनुसार आता पुढील कृषी शिक्षणाची वाटचाल होणार असून, नवीन अभ्यासक्रम अधिक प्रयोगशील तथा कृतिशील आहे, ही समाधानाची बाब आहे, असे नमूद केले.कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारूदत्त मायी यांनी कृषीपूरक उद्योगांना अधिक लोकाभिमुख करीत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांचे जाळे घट्ट करीत कायमस्वरूपी रोजगार निर्मिती साधावी व धान्योत्पादन ही प्राथमिकता तर कृषी प्रक्रिया ही त्या पुढची पायरी असल्याचे जनमनात बिंबवावे, असा सल्ला उपस्थित विद्यार्थी वर्गाला दिला. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. व्यंकटेश्‍वरुलू यांनी अशा प्रकारच्या संमेलनाची गरज अधोरेखित केली. युवकांचा देश ही आपल्या देशाला मिळालेली उपाधी शेती आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय खर्‍या अर्थाने सार्थ होणार नाही, असे सांगितले.सत्राचे प्रास्ताविक प्रांत प्रमुख प्रा. नितीन गुप्ता यांनी केले. याप्रसंगी कृषी पदवीधरांकडून प्राप्त संशोधनपर लेख असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनसुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आभार प्रदर्शन प्रांत निमंत्रक श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी कृष्णा गांगुर्डे, डॉ के. बी. पाटील, बाबासाहेब गोरे, विलास शिंदे यांच्यासह अभाविपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, प्रांत मंत्री विक्रमजित कलाने, प्रांत उपाध्यक्ष प्रा. राजू बोरकर, पंदेकृविचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची उपस्थिती होती. राज्याच्या विविध भागातून मोठय़ा संख्येने आलेले कृषी पदवीधर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संयोजन समितीचे डॉ. श्याम मुंजे, दीपिका पडोळे, डॉ. जयंत उत्तरवार, सचिन लांबे, संदीप ठेंग, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील यांच्यासह अभाविपचे अकोला महानगर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.