शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:47 IST

या अभिनव उपक्रमात भुता-खेतांबाबतचे गैरसमजुती दुर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

अकोला : भूत माणसाच्या डोक्यात असून स्मशानात उरतात फक्त कर्मकांडे हा संदेश देत उमरी येथील स्मशानभूमीत अकोल्यातील कवींची बहारदार मैफल रंगली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या वर्षी पासून सुरू केलेल्या स्मशान होलीकोत्सव या अभिनव उपक्रमात भुता-खेतांबाबतचे गैरसमजुती दुर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.अमावस्या आणि पौर्णिमेला स्मशानात भुतेजागृत होतात हा गैरसमज दूर करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महानगर शाखेच्यावतीने ‘स्मशान होलीकोत्सव ’आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे सल्लागार शरद वानखडे,जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे,डॉ.स्वप्ना लांडे, संध्याताई देशमुख , माणिकरवजी नालट यांची प्रमुख उपस्थिती होती.अंनिसचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले यांनी प्रास्ताविक करून जगात भूत नसल्याचे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी व भूतप्रेताची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी हे आयोजन असल्याची माहिती दिली. यावेळी रंगलेल्या कविसंमेलनात संतोष कोकाटे, प्रा.हरिदास आखरे, गोपाल मापारी,अमोल गोंडचवर, प्रकाश भोंडे,मनोज लेखणार,गजानन छबिले,धीरज चावरे,स्वप्नील कोकाटे, राजाभाऊ देशमुख, सुनील लव्हाळे या कवींनी बहारदार कवितांचे सादरीकरण करून प्रबोधन केले.कवी संमेलन झाल्यानंतर स्मशानात होळी पेटवून व रंग खेळून स्मशानभूमी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. शेवटी स्मशानात काही खाऊ नये या मान्यतेला छेद देण्यासाठी सर्वांनी मिळून अल्पोपहार घेतला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संध्या देशमुख, अनिल लव्हाळे, शेषराव गव्हाळे, मंगेश वानखडे,दिगंबर सांगळे, धम्मदीप इंगळे,भारत इंगोले,कौशिक पाठक, श्यामराव देशमुख, नरेंद्र चिमनकर, अ‍ॅड. रवी शर्मा, विजय बुरकले, विठ्ठल तायडे, आशु उगवेकर, विकास म्हस्के , मीनल इंगोले, रिया उगवेकर, राजेश गावंडे, संदीप देशमुख, नंदिनी सांगळे, आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाHoliहोळी