शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

अनाथ मुलांच्या संवेदना समजून घ्या अन् कार्य करा - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:01 IST

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.उत्कर्ष शिशूगृह व गायत्री बालिकाश्रमाच्यावतीने रविवारी स्रेह संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी व्यासपिठावर अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, विहींपचे महामंत्री मिलींद परांडे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष दादाजी पंत, बाल हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सुनंदा देसाई, मनीषा कुळकर्णी, रश्मी शर्मा आदी उपस्थित होते. कौटुुंबिक परिस्थिती कशीही असो, मुलांवर आई आणि वडील दोघेही भरभरून प्रेम करतात. तरीही मुलांना आईच्या मायेची उब हवीहवीशी वाटते. लहान मुलांच्या अनाथ होण्याला अनेक कंगोरे असतात. अशा चिमुकल्या मुलांना आश्रमांमध्ये भौतिक सुविधा मिळत असल्या तरी त्यांच्या भावना, संवेदनाही समजून घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. अशावेळी त्यांचे पालन पोषण करण्यासाठी विचारांपेक्षा कृतीची गरज आहे. उत्कर्ष शिशूगृह व गायत्री आश्रमाची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असून समाजात एकही बालक अनाथ राहणार नाही, यादिशेने समाजकार्य पुढे नेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काळकर यांनी तर सुत्र संचालन शारदा बियाणी यांनी केले.अनाथांच्या वेदनांवर उपाय शोधला!उत्कर्ष शिशूगृहाची आजवरची वाटचाल पाहता समाजातील अनाथ मुला-मुलींच्या वेदनांवर शिशूगृहाने उपाय शोधल्याचे दिसून येते. आश्रमाच्या कार्यामुळे अनाथ बालकांना आधार मिळाला असून या समाजकार्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात अनाथ मुलांसाठी संगोपनाचे प्रकल्प सुरु आहेत. आश्रमातील चिमुकल्यांना प्रेमाची,मायेची ऊब हवी असते. यासाठी त्यांच्यात मिसळा, त्यांना आधार देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन विहींपचे महामंत्री मिलींदजी परांडे यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील