शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अनाथ मुलांच्या संवेदना समजून घ्या अन् कार्य करा - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:01 IST

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.उत्कर्ष शिशूगृह व गायत्री बालिकाश्रमाच्यावतीने रविवारी स्रेह संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी व्यासपिठावर अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, विहींपचे महामंत्री मिलींद परांडे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष दादाजी पंत, बाल हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सुनंदा देसाई, मनीषा कुळकर्णी, रश्मी शर्मा आदी उपस्थित होते. कौटुुंबिक परिस्थिती कशीही असो, मुलांवर आई आणि वडील दोघेही भरभरून प्रेम करतात. तरीही मुलांना आईच्या मायेची उब हवीहवीशी वाटते. लहान मुलांच्या अनाथ होण्याला अनेक कंगोरे असतात. अशा चिमुकल्या मुलांना आश्रमांमध्ये भौतिक सुविधा मिळत असल्या तरी त्यांच्या भावना, संवेदनाही समजून घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. अशावेळी त्यांचे पालन पोषण करण्यासाठी विचारांपेक्षा कृतीची गरज आहे. उत्कर्ष शिशूगृह व गायत्री आश्रमाची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असून समाजात एकही बालक अनाथ राहणार नाही, यादिशेने समाजकार्य पुढे नेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काळकर यांनी तर सुत्र संचालन शारदा बियाणी यांनी केले.अनाथांच्या वेदनांवर उपाय शोधला!उत्कर्ष शिशूगृहाची आजवरची वाटचाल पाहता समाजातील अनाथ मुला-मुलींच्या वेदनांवर शिशूगृहाने उपाय शोधल्याचे दिसून येते. आश्रमाच्या कार्यामुळे अनाथ बालकांना आधार मिळाला असून या समाजकार्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात अनाथ मुलांसाठी संगोपनाचे प्रकल्प सुरु आहेत. आश्रमातील चिमुकल्यांना प्रेमाची,मायेची ऊब हवी असते. यासाठी त्यांच्यात मिसळा, त्यांना आधार देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन विहींपचे महामंत्री मिलींदजी परांडे यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील