शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलांच्या संवेदना समजून घ्या अन् कार्य करा - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:01 IST

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.उत्कर्ष शिशूगृह व गायत्री बालिकाश्रमाच्यावतीने रविवारी स्रेह संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी व्यासपिठावर अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, विहींपचे महामंत्री मिलींद परांडे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष दादाजी पंत, बाल हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सुनंदा देसाई, मनीषा कुळकर्णी, रश्मी शर्मा आदी उपस्थित होते. कौटुुंबिक परिस्थिती कशीही असो, मुलांवर आई आणि वडील दोघेही भरभरून प्रेम करतात. तरीही मुलांना आईच्या मायेची उब हवीहवीशी वाटते. लहान मुलांच्या अनाथ होण्याला अनेक कंगोरे असतात. अशा चिमुकल्या मुलांना आश्रमांमध्ये भौतिक सुविधा मिळत असल्या तरी त्यांच्या भावना, संवेदनाही समजून घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. अशावेळी त्यांचे पालन पोषण करण्यासाठी विचारांपेक्षा कृतीची गरज आहे. उत्कर्ष शिशूगृह व गायत्री आश्रमाची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असून समाजात एकही बालक अनाथ राहणार नाही, यादिशेने समाजकार्य पुढे नेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काळकर यांनी तर सुत्र संचालन शारदा बियाणी यांनी केले.अनाथांच्या वेदनांवर उपाय शोधला!उत्कर्ष शिशूगृहाची आजवरची वाटचाल पाहता समाजातील अनाथ मुला-मुलींच्या वेदनांवर शिशूगृहाने उपाय शोधल्याचे दिसून येते. आश्रमाच्या कार्यामुळे अनाथ बालकांना आधार मिळाला असून या समाजकार्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात अनाथ मुलांसाठी संगोपनाचे प्रकल्प सुरु आहेत. आश्रमातील चिमुकल्यांना प्रेमाची,मायेची ऊब हवी असते. यासाठी त्यांच्यात मिसळा, त्यांना आधार देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन विहींपचे महामंत्री मिलींदजी परांडे यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील