शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

अनाथ मुलांच्या संवेदना समजून घ्या अन् कार्य करा - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:01 IST

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.

अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.उत्कर्ष शिशूगृह व गायत्री बालिकाश्रमाच्यावतीने रविवारी स्रेह संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी व्यासपिठावर अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, विहींपचे महामंत्री मिलींद परांडे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष दादाजी पंत, बाल हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सुनंदा देसाई, मनीषा कुळकर्णी, रश्मी शर्मा आदी उपस्थित होते. कौटुुंबिक परिस्थिती कशीही असो, मुलांवर आई आणि वडील दोघेही भरभरून प्रेम करतात. तरीही मुलांना आईच्या मायेची उब हवीहवीशी वाटते. लहान मुलांच्या अनाथ होण्याला अनेक कंगोरे असतात. अशा चिमुकल्या मुलांना आश्रमांमध्ये भौतिक सुविधा मिळत असल्या तरी त्यांच्या भावना, संवेदनाही समजून घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. अशावेळी त्यांचे पालन पोषण करण्यासाठी विचारांपेक्षा कृतीची गरज आहे. उत्कर्ष शिशूगृह व गायत्री आश्रमाची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असून समाजात एकही बालक अनाथ राहणार नाही, यादिशेने समाजकार्य पुढे नेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काळकर यांनी तर सुत्र संचालन शारदा बियाणी यांनी केले.अनाथांच्या वेदनांवर उपाय शोधला!उत्कर्ष शिशूगृहाची आजवरची वाटचाल पाहता समाजातील अनाथ मुला-मुलींच्या वेदनांवर शिशूगृहाने उपाय शोधल्याचे दिसून येते. आश्रमाच्या कार्यामुळे अनाथ बालकांना आधार मिळाला असून या समाजकार्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात अनाथ मुलांसाठी संगोपनाचे प्रकल्प सुरु आहेत. आश्रमातील चिमुकल्यांना प्रेमाची,मायेची ऊब हवी असते. यासाठी त्यांच्यात मिसळा, त्यांना आधार देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन विहींपचे महामंत्री मिलींदजी परांडे यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील