शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

उडीद-मूग गेला; ज्वारी-कपाशी पडतेय काळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:09 IST

तेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच  अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला.  उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य  झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात  झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत  आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पिकाचेही नुकसानशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच  अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला.  उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य  झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात  झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत  आहे.यावर्षीचा खरीप हंगाम हा शेतकर्‍यांना विविध संकटांचा  राहिला. सुरुवातीला पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली.  त्यानंतर पाऊस आला; परंतु पिकांना मार बसून पिके जोमात  येण्यास वेळ लागला. शेतकर्‍यांनी आहे त्या सिंचन सुविधेवर  पिके वाढविली; परंतु अनियमित हवामान व पाण्यामुळे  िपकांवर विशेषत: मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी पिकावर  विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. मूग, उडिदावर  मोझ्ॉक नावाचा व्हायरस आल्याने काही भागात शून्य उत् पादन झाले. सोयाबीन पिकावर ऐन फळधारणेच्या वेळी व्हायरस येऊन  शेंगा लागल्या नाहीत. शेतकर्‍यांनी या पिकाची आशा  सोडल्यानंतर कपाशी, ज्वारी पिकाचे उत्पादन तर झाले; पण  परतीच्या पावसाने ज्वारीची पक्व कणसे काळी पडत आहेत.  जोरदार वार्‍यासह भरपूर पाऊस पडत असल्याने बागाय तीसह कोरडवाहू कपाशीसुद्धा पसरली आहे. त्यामुळे क पाशीला खालच्या बाजूने लागलेली पक्व बोंडे काळी पडत  आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने  पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे खरीप पिके  गेल्यागत असल्याने शेतकर्‍यांच्या सर्व आशा रब्बी पिकांवर  केंद्रित आहेत. रब्बी पिके घेताना सर्वांच्या नजरा त्या वान प्रकल्प  हनुमानसागराकडे लागतात. हनुमानसागराची पाणी पातळी  सध्या ७0 टक्के असून, पाणी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यास  रब्बीच्या हंगामात शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळू शक ते.