शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: September 17, 2014 02:43 IST

तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील घटना; पोहताना झाला घात

खंडाळा (तेल्हारा) : येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी म्हणून गेलेल्या १८ वर्षे वयाच्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना १६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. रात्री उशिरा दोन्ही मुलांचे मृ तदेह सापडले.खंडाळा येथील रहिवासी असलेले सौरव विनोद डांगे व ज्ञानेश्‍वर रामेश्‍वर नांदुरकर हे दोघे तरूण बुधवार १६ सप्टेबरला दुपारी १२ वाजता विनोद डांगे यांच्या वखरणीचे काम सुरू असल्यामुळे शे तात जातो असे घरी सांगून निघून गेले होते. डांगे यांच्या शेताच्या बाजूला गणेश धूळ यांच्या शेतात शेततळे आहे. त्या शेततळ्यात ताडपत्री टाकलेली आहे. तेथे पोहण्यासाठी म्हणून ते दोघेही कुणालाही न सांगता गेले. परंतु , त्या शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ते दोघेही हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकतात. ते दोघेही सायंकाळपर्यंंत घरी पर त आले नसल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी व नातेवाइकांनी त्यांचा ठिकठिकाणी शोध घेणे सुरू केले. या शोध मोहिमेत अखेर रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास धूळ यांच्या शेततळ्याच्या काठावर त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. त्यामुळे शोध घेणार्‍यांनी शेततळ्यात बॅटरीचा प्रकाशझोत टाकून पाहिले असता दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती खंडाळ्याचे पोलिस पाटील अरूण तायडे व सरपंच सुरेश जाधव यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला कळविली. त्यानुसार पोलिस रात्री घटनास्थळी पोहोचली व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.हे वृत्त लिहिपर्यत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.