शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

दुचाकी, चारचाकीधारकांनो, धान्याचा लाभ विसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:07 IST

लाभार्थींनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा सपाटा आता शासनाकडून लावला जाणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वाटपाच्या योजनेत पात्र ठरण्यासाठी दुचाकी, चारचाकी, जमीन मालकी हक्काबाबत लाभार्थींनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा सपाटा आता शासनाकडून लावला जाणार आहे. त्यासाठी दुचाकी, चारचाकीधारक आणि जमीन मालकीच्या माहितीची पडताळणी परिवहन व महसूल विभागाकडून केली जाणार आहे. त्यामुळे आता शहरी, ग्रामीण भागातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक लाभार्थी धान्यासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. हा निर्णय १३ जून रोजी घेण्यात आला.राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारक असलेल्या ३६ टक्के कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून सवलतीच्या दरातील धान्य, रॉकेल मिळत नसल्याचे राज्याच्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणीमध्ये पुढे आले. त्यामध्ये पुढे आलेल्या निष्कर्षात ग्रामीण भागातील ९१ टक्के कुटुंबांकडे तर शहरी भागात ६८ टक्के कुटुंबांकडे शिधापत्रिका आहेत. त्यापैकी धान्य मिळण्यासाठी पात्र असताना अनुक्रमे १२ आणि २४ टक्के कुटुंबांना ते मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामध्ये अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, अन्नपूर्णा, केशरी या प्रकारातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश आहे. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी दुचाकी, चारचाकीधारक, मोठ्या शेतकऱ्यांनी लाभासाठी चुकीची माहिती दिल्याचे पुढे आले. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात शिधापत्रिकाधारक लाभासाठी पात्र नसल्याचे राज्याच्या लोकलेखा समितीने २०१२-१३ या वर्षाच्या लेखा परीक्षणात नमूद केले. त्या लाभार्थींकडे असलेल्या दुचाकी, चारचाकी, जमीन मालकी हक्काच्या कागदपत्रांची छाननी करून रद्द करण्याचे बजावले आहे.- शोधमोहिमेत रद्द होणार धान्याचा लाभ!अपात्र ठरणाऱ्यांमध्ये आता दुचाकी, चारचाकीधारक, मोठ्या शेतकºयांनी धान्याचा लाभ मिळण्यासाठी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये वाहनधारकांची माहिती परिवहन विभाग, तर जमीन मालकीची माहिती महसूल विभागाकडून घेतली जाणार आहे.- आॅफलाइन वाटप तपासणीही गुंडाळली!त्याचवेळी ज्या लाभार्थींना मॅन्युअली धान्य वाटप केले जाते, ते पात्र आहेत की नाही, ही बाब आर्थिक पाहणी अहवालातही पुढे आली. त्यामुळे लाभार्थींची पडताळणी करण्याचे निर्देश पुरवठा विभागाने जुलै २०१८ मध्येच दिले; मात्र पुरवठा यंत्रणेनेच त्यामध्ये खोडा घातला. कोणत्याही जिल्ह्यातील मॅन्युअली वाटप होणाºया नॉमिनीचा अहवाल शासनाकडे गेलाच नसल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला