शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

दुचाकी, चारचाकीधारकांनो, धान्याचा लाभ विसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:07 IST

लाभार्थींनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा सपाटा आता शासनाकडून लावला जाणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वाटपाच्या योजनेत पात्र ठरण्यासाठी दुचाकी, चारचाकी, जमीन मालकी हक्काबाबत लाभार्थींनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा सपाटा आता शासनाकडून लावला जाणार आहे. त्यासाठी दुचाकी, चारचाकीधारक आणि जमीन मालकीच्या माहितीची पडताळणी परिवहन व महसूल विभागाकडून केली जाणार आहे. त्यामुळे आता शहरी, ग्रामीण भागातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक लाभार्थी धान्यासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. हा निर्णय १३ जून रोजी घेण्यात आला.राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारक असलेल्या ३६ टक्के कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून सवलतीच्या दरातील धान्य, रॉकेल मिळत नसल्याचे राज्याच्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणीमध्ये पुढे आले. त्यामध्ये पुढे आलेल्या निष्कर्षात ग्रामीण भागातील ९१ टक्के कुटुंबांकडे तर शहरी भागात ६८ टक्के कुटुंबांकडे शिधापत्रिका आहेत. त्यापैकी धान्य मिळण्यासाठी पात्र असताना अनुक्रमे १२ आणि २४ टक्के कुटुंबांना ते मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामध्ये अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, अन्नपूर्णा, केशरी या प्रकारातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश आहे. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी दुचाकी, चारचाकीधारक, मोठ्या शेतकऱ्यांनी लाभासाठी चुकीची माहिती दिल्याचे पुढे आले. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात शिधापत्रिकाधारक लाभासाठी पात्र नसल्याचे राज्याच्या लोकलेखा समितीने २०१२-१३ या वर्षाच्या लेखा परीक्षणात नमूद केले. त्या लाभार्थींकडे असलेल्या दुचाकी, चारचाकी, जमीन मालकी हक्काच्या कागदपत्रांची छाननी करून रद्द करण्याचे बजावले आहे.- शोधमोहिमेत रद्द होणार धान्याचा लाभ!अपात्र ठरणाऱ्यांमध्ये आता दुचाकी, चारचाकीधारक, मोठ्या शेतकºयांनी धान्याचा लाभ मिळण्यासाठी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये वाहनधारकांची माहिती परिवहन विभाग, तर जमीन मालकीची माहिती महसूल विभागाकडून घेतली जाणार आहे.- आॅफलाइन वाटप तपासणीही गुंडाळली!त्याचवेळी ज्या लाभार्थींना मॅन्युअली धान्य वाटप केले जाते, ते पात्र आहेत की नाही, ही बाब आर्थिक पाहणी अहवालातही पुढे आली. त्यामुळे लाभार्थींची पडताळणी करण्याचे निर्देश पुरवठा विभागाने जुलै २०१८ मध्येच दिले; मात्र पुरवठा यंत्रणेनेच त्यामध्ये खोडा घातला. कोणत्याही जिल्ह्यातील मॅन्युअली वाटप होणाºया नॉमिनीचा अहवाल शासनाकडे गेलाच नसल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला