शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी जाणून घेणार शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 13:08 IST

कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तद्वतच ७२ कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान, माहिती देणार आहेत.

अकोला: विदर्भातील शेती शाश्वत, समृद्धतेकडे नेण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले असून, याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तद्वतच ७२ कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान, माहिती देणार आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानुषंगाने शेती व शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवार फेरी, अ‍ॅग्रोटेक आदी माध्यमातून शेतकºयांचे प्रबोधन करण्यात आले. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान, विविध पिके प्रात्यक्षिक स्वरू पात शिवारफेरीतून दाखविण्यात आली, तर नव्या संशोधनाची वाटचाल, आलेले भरपूर उत्पादन, विकसित यंत्र, बी-बियाणे,जैविक खते, ट्रायकोडर्मा, नवीन पिकाच्या जाती आदींची माहिती शेतकºयांना अ‍ॅग्रोटेकमधून देण्यात आली. कृषी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. पीकवार शेतावर शेती शाळा घेऊन शेतकºयांना त्या-त्या पिकांचे तंत्रज्ञान, व्यवस्थापन समजावून सांगितले जात आहे. पीक रचना, पीक पद्धतीत बदल करू न अधिक उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेती विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कृषी विद्यापीठात यावर संशोधन करण्यात येणार आहे. कृषी विद्या शाखेच्या प्रक्षेत्रावर यासाठीचे अनेक प्रयोग घेण्यात येत आहेत. सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेण्यात येत असून, हे काम विद्यार्थी करीत आहेत.

 विदर्भातील शेती, शेतकरी विकासाच्या दृष्टीने यावर्षी विदर्भातील प्रत्येक गावात कृषी विद्यापीठाचे संशोधन, तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी दोन हजार विद्यार्थ्यांसह ७२ शास्त्रज्ञ काम करीत आहेत. शेती समृद्ध, शाश्वत करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ