शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विदर्भात दोन नवीन शासकीय कृषी महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:35 IST

प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठविला असून, शासनाने दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देविदर्भात सात शासकीय तसेच २८ खासगी कृषी महाविद्यालये आहेत.प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. चार कृषी महाविद्यालये मिळावीत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

- राजरत्न सिरसाट

अकोला : कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमाकडे वाढला; परंतु शासकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहेत. याच अनुषंगाने विदर्भात चार शासकीय पदवी कृषी महाविद्यालय देण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठविला असून, शासनाने दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता दिली आहे.विदर्भात सात शासकीय तसेच २८ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. दुसरीकडे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यात एक लाखावर विद्यार्थ्यांनी कृषी पदवीसाठी अर्ज भरले होते. पण, खासगी वगळता शासकीय कृषी महाविद्यालये कमी असून, विदर्भात तर केवळ ही संख्या सात आहे. त्यामुळे विदर्भात केवळ २,३५० विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने विद्यार्थ्यांना पर्याय निवडावे लागत आहेत. कृषी व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने यावर्षी राष्टÑीय प्रवेश पात्रता (नीट) पूर्व परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. ५५ टक्केपर्यंत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र ठरल्याने, कृषी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी येत आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांची कृषी या विषयाला पहिली पसंती असते. याच अनुषंगाने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने चार कृषी महाविद्यालये मिळावीत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. यातील यवतमाळ येथे अन्न व तंत्रज्ञान अभियांत्रिकी, तर मूल येथे कृषी महाविद्यालयासाठीची तत्त्वता मान्यता शासनाने दिली. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच निघणार आहे. वािशम व बुलडाणा येथे प्रत्येकी एक शासकीय कृषी महाविद्यालयाची गरज असल्याने यासंदर्भातील पाठवलेला प्रस्तावही मान्य करण्यात आला. आता प्रत्यक्षात महाविद्यालय केव्हा सुरू होते, याकडे विदर्भातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. याच अनुषंगाने चार शासकीय महाविद्यालांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यातील दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता मिळाली असून, इतर दोन महाविद्यालयही देण्याचे शासनाने मान्य केले आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ