शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आठवीपर्यंतचे दोन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : काेराेनामुळे गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच्या भरवशावरच झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : काेराेनामुळे गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच्या भरवशावरच झाले. त्यामुळे मुलांचे मूल्यांकन कसे हाेणार अन् मुलांनी किती ज्ञान आत्मसात केले याबाबत पालकच चिंतित असताना शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार ५०६ विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खुश आहेत; परंतु मुलांचा पुरेसा अभ्यास न झाल्याने पालक चिंतित आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी मूल्यांकनाचा दर्जा व मुलांची खरंच याेग्यता वाढली का, हा प्रश्नच आहे. सरसकट पास या निर्णयावर काही पालकांनी नाराजीही व्यक्त केली आहे

काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ

काेट

काेराेनाच्या उद्रेकामुळे याक्षणी तरी सरकारसमोर हा एकमेव पर्याय आहे, मात्र काेराेनानंतर आता सरकारने शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे, अन्यथा मूल्यांकन न करता विद्यार्थ्यांना पास करणे म्हणजे शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही परिणाम हाेईल.

- डाॅ. संजय खडक्कार, शिक्षणतज्ज्ञ

पालक म्हणतात..

शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीही होता. फक्त परीक्षा घेण्यात येत होत्या. यावेळी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता नव्हती. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार नसले तरी ऑनलाइन शिक्षणाचे मूल्यांकन किती याचे उत्तर या निर्णयामुळे अनुत्तरितच राहिले

- दीपशिखा शेगाेकार , पालक

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या. परीक्षांमुळे किमान विद्यार्थ्यांची काय तयारी झाली हे कळते. इतर परीक्षा आफलाइन हाेत असताना सरसकट पास करणे याेग्य नाही यामुळे मुलांच्या अध्ययन क्षमतेवरच प्रश्न उपस्थित हाेऊ शकताे.

- भावना इंगळे, पालक

ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे योग्य शिक्षण झाले नाही हे खरे असले तरी काेराेनाच्या वाढत्या उद्रेकामुळे मुलांचे काय होईल, याबाबत चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने माेठा दिलासा आहे. एखादवेळ परीक्षा न हाेण्याने काही फरक पडत नाही.

- अनिरूद्ध देशपांडे , पालक

जिल्ह्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी संख्या

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली २९,४१०

दुसरी २९,२४८

तिसरी २९,८७०

चाैथी ३०,१८५

पाचवी २९,६५७

सहावी २९,२८९

सातवी २८,८४७

आठवी २८,७९७

एकूण २,०६,५०६

महापलिकेच्या???????????