शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

आठवीपर्यंतचे दोन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : काेराेनामुळे गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच्या भरवशावरच झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : काेराेनामुळे गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच्या भरवशावरच झाले. त्यामुळे मुलांचे मूल्यांकन कसे हाेणार अन् मुलांनी किती ज्ञान आत्मसात केले याबाबत पालकच चिंतित असताना शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार ५०६ विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खुश आहेत; परंतु मुलांचा पुरेसा अभ्यास न झाल्याने पालक चिंतित आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी मूल्यांकनाचा दर्जा व मुलांची खरंच याेग्यता वाढली का, हा प्रश्नच आहे. सरसकट पास या निर्णयावर काही पालकांनी नाराजीही व्यक्त केली आहे

काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ

काेट

काेराेनाच्या उद्रेकामुळे याक्षणी तरी सरकारसमोर हा एकमेव पर्याय आहे, मात्र काेराेनानंतर आता सरकारने शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे, अन्यथा मूल्यांकन न करता विद्यार्थ्यांना पास करणे म्हणजे शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही परिणाम हाेईल.

- डाॅ. संजय खडक्कार, शिक्षणतज्ज्ञ

पालक म्हणतात..

शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीही होता. फक्त परीक्षा घेण्यात येत होत्या. यावेळी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता नव्हती. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार नसले तरी ऑनलाइन शिक्षणाचे मूल्यांकन किती याचे उत्तर या निर्णयामुळे अनुत्तरितच राहिले

- दीपशिखा शेगाेकार , पालक

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या. परीक्षांमुळे किमान विद्यार्थ्यांची काय तयारी झाली हे कळते. इतर परीक्षा आफलाइन हाेत असताना सरसकट पास करणे याेग्य नाही यामुळे मुलांच्या अध्ययन क्षमतेवरच प्रश्न उपस्थित हाेऊ शकताे.

- भावना इंगळे, पालक

ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे योग्य शिक्षण झाले नाही हे खरे असले तरी काेराेनाच्या वाढत्या उद्रेकामुळे मुलांचे काय होईल, याबाबत चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने माेठा दिलासा आहे. एखादवेळ परीक्षा न हाेण्याने काही फरक पडत नाही.

- अनिरूद्ध देशपांडे , पालक

जिल्ह्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी संख्या

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली २९,४१०

दुसरी २९,२४८

तिसरी २९,८७०

चाैथी ३०,१८५

पाचवी २९,६५७

सहावी २९,२८९

सातवी २८,८४७

आठवी २८,७९७

एकूण २,०६,५०६

महापलिकेच्या???????????