शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दोन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 22, 2015 01:48 IST

अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी मंगळवारी आत्महत्या केली.

अकोला: नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी मंगळवारी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील प्रदीप श्रीराम बोबडे (वय ४५) व त्यांच्या भावाकडे १ एकर शेत होते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना बसला. या संकटातून प्रदीप बोबडेही वाचू शकले नाहीत. यंदा त्यांना १ क्विंटल १८ किलो सोयाबीनचे उत्पादन झाले. कर्ज कसे फेडावे, संसाराचा गाडा कसा ओढावा, या विवंचनेतच त्यांनी मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते. शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली. सततची नापिकी आणि कर्जाचा बोजा, याशिवाय व्यवसायासाठी केलेल्या प्रयत्नांमध्येही अपयश; एकूणच परिस्थितीमुळे जगणे असहय़ होऊन या तालुक्यातील शिंदी हराळी येथील भागवत मोतेसिंग मोरे (वय ३८) नामक शेतकर्‍याने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आई, पत्नी, दोन भाऊ आणि तीन मुले या सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी या तरूण शेतकर्‍यावर होती. त्यांच्या दोन भावांपैकी एक भाऊ सतत आजारी, तर दुसरा अपंग आहे. ३ एकर कोरडवाहू शेतीवर त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा चालू होता; मात्र सततच्या नापिकीमुळे आर्थिक परिस्थिती खालावली, कृषी कर्जाची परतफेडही होवू शकली नाही. शेतीला जोडधंदा म्हणून ऑटोरिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातही अपयश आल्याने भागवत मोरे यांनी मंगळवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.