शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दोन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 22, 2015 01:48 IST

अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी मंगळवारी आत्महत्या केली.

अकोला: नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी मंगळवारी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील प्रदीप श्रीराम बोबडे (वय ४५) व त्यांच्या भावाकडे १ एकर शेत होते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना बसला. या संकटातून प्रदीप बोबडेही वाचू शकले नाहीत. यंदा त्यांना १ क्विंटल १८ किलो सोयाबीनचे उत्पादन झाले. कर्ज कसे फेडावे, संसाराचा गाडा कसा ओढावा, या विवंचनेतच त्यांनी मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते. शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली. सततची नापिकी आणि कर्जाचा बोजा, याशिवाय व्यवसायासाठी केलेल्या प्रयत्नांमध्येही अपयश; एकूणच परिस्थितीमुळे जगणे असहय़ होऊन या तालुक्यातील शिंदी हराळी येथील भागवत मोतेसिंग मोरे (वय ३८) नामक शेतकर्‍याने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आई, पत्नी, दोन भाऊ आणि तीन मुले या सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी या तरूण शेतकर्‍यावर होती. त्यांच्या दोन भावांपैकी एक भाऊ सतत आजारी, तर दुसरा अपंग आहे. ३ एकर कोरडवाहू शेतीवर त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा चालू होता; मात्र सततच्या नापिकीमुळे आर्थिक परिस्थिती खालावली, कृषी कर्जाची परतफेडही होवू शकली नाही. शेतीला जोडधंदा म्हणून ऑटोरिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातही अपयश आल्याने भागवत मोरे यांनी मंगळवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.