शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:54 IST

अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.

गांधीग्राम/ रोहणखेड : सतची नापीकी व वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून गांधीग्राम व बांबर्डा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.गांधीग्राम येथील अरुण शेषराव काठोळे (५०) हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे शेजारी असलेल्या शेतकºयांच्या लक्षात आले. शेतकºयांनी त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११:३० दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण काठोळे यांच्यावर पंधरा ते वीस हजार रुपये बँकेचे कर्ज आहे. तसेच पन्नास हजार रुपयांचे मुद्रा लोण आहे. तर नातलगांजवळून काही उसनवारी घेतलेली होती.गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पीक झाले नाही. यंदाही भरपुर पाऊस झाल्यामुळे त्यांची कपाशी पिवळी पडली आहे. तसेच मूगाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते अस्वस्थ राहत होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांचे जवळ पाऊण एकर (३० गुंठे) शेत आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.रोहणखेड येथून जवळच असलेल्या बांबर्डा येथील नामदेवराव तुळशीराम धर्माळे (७५)यांनी २८ सप्टेंबर रोजी सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून शेततळ््यात उडी घेउन आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतात अल्प उत्पादन होत होते. शेती मशागतीसाठी त्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी संततार पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. २८ सप्टेंबर रोजी घरी कुणालाही न सांगता ते शेतात गेले होते. शेतातील शेततळ््यात उडी घेउन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व आप्त परिवार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या