शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:54 IST

अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.

गांधीग्राम/ रोहणखेड : सतची नापीकी व वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून गांधीग्राम व बांबर्डा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.गांधीग्राम येथील अरुण शेषराव काठोळे (५०) हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे शेजारी असलेल्या शेतकºयांच्या लक्षात आले. शेतकºयांनी त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११:३० दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण काठोळे यांच्यावर पंधरा ते वीस हजार रुपये बँकेचे कर्ज आहे. तसेच पन्नास हजार रुपयांचे मुद्रा लोण आहे. तर नातलगांजवळून काही उसनवारी घेतलेली होती.गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पीक झाले नाही. यंदाही भरपुर पाऊस झाल्यामुळे त्यांची कपाशी पिवळी पडली आहे. तसेच मूगाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते अस्वस्थ राहत होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांचे जवळ पाऊण एकर (३० गुंठे) शेत आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.रोहणखेड येथून जवळच असलेल्या बांबर्डा येथील नामदेवराव तुळशीराम धर्माळे (७५)यांनी २८ सप्टेंबर रोजी सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून शेततळ््यात उडी घेउन आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतात अल्प उत्पादन होत होते. शेती मशागतीसाठी त्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी संततार पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. २८ सप्टेंबर रोजी घरी कुणालाही न सांगता ते शेतात गेले होते. शेतातील शेततळ््यात उडी घेउन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व आप्त परिवार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या