शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:54 IST

अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.

गांधीग्राम/ रोहणखेड : सतची नापीकी व वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून गांधीग्राम व बांबर्डा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.गांधीग्राम येथील अरुण शेषराव काठोळे (५०) हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे शेजारी असलेल्या शेतकºयांच्या लक्षात आले. शेतकºयांनी त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११:३० दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण काठोळे यांच्यावर पंधरा ते वीस हजार रुपये बँकेचे कर्ज आहे. तसेच पन्नास हजार रुपयांचे मुद्रा लोण आहे. तर नातलगांजवळून काही उसनवारी घेतलेली होती.गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पीक झाले नाही. यंदाही भरपुर पाऊस झाल्यामुळे त्यांची कपाशी पिवळी पडली आहे. तसेच मूगाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते अस्वस्थ राहत होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांचे जवळ पाऊण एकर (३० गुंठे) शेत आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.रोहणखेड येथून जवळच असलेल्या बांबर्डा येथील नामदेवराव तुळशीराम धर्माळे (७५)यांनी २८ सप्टेंबर रोजी सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून शेततळ््यात उडी घेउन आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतात अल्प उत्पादन होत होते. शेती मशागतीसाठी त्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी संततार पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. २८ सप्टेंबर रोजी घरी कुणालाही न सांगता ते शेतात गेले होते. शेतातील शेततळ््यात उडी घेउन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व आप्त परिवार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या