शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

अकोला : नुकताच दहावीचा घवघवीत निकाल लागला. आता बारावीचा निकाल लागायचा आहे. परंतु विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल कसा लागेल. याचीच ...

अकोला : नुकताच दहावीचा घवघवीत निकाल लागला. आता बारावीचा निकाल लागायचा आहे. परंतु विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल कसा लागेल. याचीच चिंता सतावत आहे. निकालाच्या ३०-३०-४० या सूत्राने विद्यार्थ्याची झोप उडविली आहे. दहावी-अकरावीच्या गुणांचा आधार घेऊन शिक्षण मंडळाकडून कसा निकाल लागेल. याची चिंता विद्यार्थ्यांना आहे.

बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका तर बसणार नाही ना! अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. यंदा दहावीचा कधी नव्हे असा ऐतिहासिक निकाल लागला. काही अपवाद वगळता, १०० टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुण सुद्धा चांगले देण्यात आले. परंतु आता बारावीचा निकाल कसा लागणार, याची चिंता आहे. कारण बारावीचा निकाल दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के याआधारे लागणार आहे. त्यामुळे चांगले गुण मिळतील की नाही, दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण मिळून एकूण निकाल कसा तयार करतील, कोणत्या पद्धतीने गुण देतील, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे.

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी - ४३२

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड -२४८०९

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण मिळून निकाल लागणार आहे. आता या तीन वर्गांमध्ये चांगले गुण मिळाले असतील, तर बारावीतही चांगले गुण मिळतील. परंतु या तीन वर्गात कमी गुण मिळाले असतील, तर बारावीत कसे चांगले गुण मिळतील. याची चिंता आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वाटते. परंतु बारावीत ४० टक्क्यांचे सूत्र आहे. त्यामुळे चांगले गुण मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- संचित शैलेश शिरसाट, विद्यार्थी (फोटो)

बारावीच्या निकालाविषयी मनात धाकधुक तर आहेच, परंतु मला दहावी, अकरावीमध्ये चांगले गुण मिळाले असल्यामुळे बारावी परीक्षेत ९० टक्क्यांवर गुण मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु आता ३०-३०-४० या सूत्रानुसार निकाल कसा लागतो, किती टक्के मिळतात, याविषयी उत्सुकता आहे.

- समृद्धी विलास डहाके, विद्यार्थिनी (फोटो)

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

३०-३०-४० या सूत्रानुसार निकाल कमी लागण्याची शक्यता आहे. दहावी, अकरावीत कमी गुण असतील, तर याचा बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.

- माधव मुन्शी, प्राचार्य, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय

३०-३०-४० असे सूत्र असले तरी, बोर्डाने बारावीतील ४० टक्के गुण देण्याचा निर्णय घेतला असून, तो चांगला आहे. दहावीत सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत. परंतु विद्यार्थी अकरावी सहजतेने घेतात. परंतु चिंता करण्याची गरज नाही. बारावीचा निकालही उत्कृष्टच लागेल.

- प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, उपप्राचार्य, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय