शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

अकोला : नुकताच दहावीचा घवघवीत निकाल लागला. आता बारावीचा निकाल लागायचा आहे. परंतु विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल कसा लागेल. याचीच ...

अकोला : नुकताच दहावीचा घवघवीत निकाल लागला. आता बारावीचा निकाल लागायचा आहे. परंतु विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल कसा लागेल. याचीच चिंता सतावत आहे. निकालाच्या ३०-३०-४० या सूत्राने विद्यार्थ्याची झोप उडविली आहे. दहावी-अकरावीच्या गुणांचा आधार घेऊन शिक्षण मंडळाकडून कसा निकाल लागेल. याची चिंता विद्यार्थ्यांना आहे.

बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका तर बसणार नाही ना! अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. यंदा दहावीचा कधी नव्हे असा ऐतिहासिक निकाल लागला. काही अपवाद वगळता, १०० टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुण सुद्धा चांगले देण्यात आले. परंतु आता बारावीचा निकाल कसा लागणार, याची चिंता आहे. कारण बारावीचा निकाल दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के याआधारे लागणार आहे. त्यामुळे चांगले गुण मिळतील की नाही, दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण मिळून एकूण निकाल कसा तयार करतील, कोणत्या पद्धतीने गुण देतील, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे.

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी - ४३२

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड -२४८०९

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण मिळून निकाल लागणार आहे. आता या तीन वर्गांमध्ये चांगले गुण मिळाले असतील, तर बारावीतही चांगले गुण मिळतील. परंतु या तीन वर्गात कमी गुण मिळाले असतील, तर बारावीत कसे चांगले गुण मिळतील. याची चिंता आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वाटते. परंतु बारावीत ४० टक्क्यांचे सूत्र आहे. त्यामुळे चांगले गुण मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- संचित शैलेश शिरसाट, विद्यार्थी (फोटो)

बारावीच्या निकालाविषयी मनात धाकधुक तर आहेच, परंतु मला दहावी, अकरावीमध्ये चांगले गुण मिळाले असल्यामुळे बारावी परीक्षेत ९० टक्क्यांवर गुण मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु आता ३०-३०-४० या सूत्रानुसार निकाल कसा लागतो, किती टक्के मिळतात, याविषयी उत्सुकता आहे.

- समृद्धी विलास डहाके, विद्यार्थिनी (फोटो)

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

३०-३०-४० या सूत्रानुसार निकाल कमी लागण्याची शक्यता आहे. दहावी, अकरावीत कमी गुण असतील, तर याचा बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.

- माधव मुन्शी, प्राचार्य, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय

३०-३०-४० असे सूत्र असले तरी, बोर्डाने बारावीतील ४० टक्के गुण देण्याचा निर्णय घेतला असून, तो चांगला आहे. दहावीत सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत. परंतु विद्यार्थी अकरावी सहजतेने घेतात. परंतु चिंता करण्याची गरज नाही. बारावीचा निकालही उत्कृष्टच लागेल.

- प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, उपप्राचार्य, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय