शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

तुळशीचं अंगण हरवलं!

By admin | Updated: November 25, 2015 02:16 IST

अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे.

नितीन गव्हाळे /अकोला : भारतीय संस्कृतीमध्येच काय, आयुर्वेदामध्येसुद्धा तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'तुलसी श्रीसखी शुभे पापहारिणी पुण्य दे' असे म्हटले जाते ते उगाच नाही. पूर्वी प्रत्येकाच्या घरासमोर सुंदरसं तुळशी वृंदावन असायचं. सकाळच्या प्रहरी तुळशीची पूजा होऊन घरात एकप्रकारचे धार्मिक वातावरण तयार व्हायचे; परंतु सध्याच्या काळात हे सर्व हरवत चाललं आहे. अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे. खरं म्हणजे, तुळशीचं हक्काचं अंगणच हरवलं आहे. लोकसंख्येच्या स्फोटात स्वतंत्र घरांचे अस्तित्व, घराची शोभा वाढविणारे तुळशी वृंदावन आणि एकूणच घरपण नष्ट होत चालले आहे. एकेकाळी हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला महत्त्व होते. वृंदावन नसलेले घर क्वचितच बघायला मिळे. तुळशी वृंदावन अंगणात असण्यामागे धार्मिक किंवा आयुर्वेदिक आधार होता. 'तुळशी वृंदावन जयाचे द्वारी।। धन्य तो प्राणी संसारी। तयाच्या पुण्या नाही सरी।। नित्य तो तुलसीस नमस्कारी।। त्यासी देखोनि यम पळे दुरी।। विष्णुदूत आदर करी।।' असे 'तुळशी माहात्म्य'मध्ये म्हटले आहे. साधारणत: १५-२0 वर्षांपूर्वीचा विचार केला, तर अंगणातील तुळशी वृंदावनासमोर महिला भगिनी दररोज तुळशीला पाणी घालत, प्रदक्षिणा घालून पूजा करीत असत. सायंकाळी दिवा लावला जायचा. अलीकडच्या काळात फ्लॅट संस्कृतीचा शिरकाव झाला. वाढत्या लोकसंख्येसाठी तरतूद म्हणून अपार्टमेंटसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. फ्लॅट संस्कृतीमध्ये दारासमोर अंगणच नसल्याने तुळशी वृंदावनाची संकल्पना बाजूला पडली. जुन्या काळी लोक घर बांधताना तुळशी वृंदावन आवर्जून उभारीत असत. अलीकडे तुळशीचे अंगणच हिरावून घेतले आहे. तुळशी वृंदावन संस्कृतीच आम्ही मोडीत काढली आहे.

*वृंदावन हरवलं अन् संस्कारही!

तुळशीचं वृंदावन तर हरवलंच, परंतु त्यासोबत लहान मुलांवरील संस्कारसुद्धा हरविले. घरातील आई, वडीलधारी माणसं सायंकाळी लहान मुलांना घेऊन तुळशीसमोर 'दिवा लागला तुळशीपाशी..', 'दिव्या दिव्या दीपत्कार..' यांसह धार्मिक श्लोक म्हणायला लावीत. अलीकडे हे सर्व नाहिसं झालं. वृंदावनासोबतच आमचे संस्कारसुद्धा हरवत चालले आहेत.

*आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य

वेद, पुराण, आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य सांगितले आहे. श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशी पानांनी विष्णूचे पूजन केले, तर व्रत, यज्ञ, जाप केल्याचे फळ लाभते. कृष्णपत्नी रुक्मिणीचा अवतार तुळस आहे, असे मानले जाते. म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह लावला जातो आणि या दिवसापासून विवाह मुहूर्त प्रारंभ होतात.