शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

तुळशीचं अंगण हरवलं!

By admin | Updated: November 25, 2015 02:16 IST

अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे.

नितीन गव्हाळे /अकोला : भारतीय संस्कृतीमध्येच काय, आयुर्वेदामध्येसुद्धा तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'तुलसी श्रीसखी शुभे पापहारिणी पुण्य दे' असे म्हटले जाते ते उगाच नाही. पूर्वी प्रत्येकाच्या घरासमोर सुंदरसं तुळशी वृंदावन असायचं. सकाळच्या प्रहरी तुळशीची पूजा होऊन घरात एकप्रकारचे धार्मिक वातावरण तयार व्हायचे; परंतु सध्याच्या काळात हे सर्व हरवत चाललं आहे. अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे. खरं म्हणजे, तुळशीचं हक्काचं अंगणच हरवलं आहे. लोकसंख्येच्या स्फोटात स्वतंत्र घरांचे अस्तित्व, घराची शोभा वाढविणारे तुळशी वृंदावन आणि एकूणच घरपण नष्ट होत चालले आहे. एकेकाळी हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला महत्त्व होते. वृंदावन नसलेले घर क्वचितच बघायला मिळे. तुळशी वृंदावन अंगणात असण्यामागे धार्मिक किंवा आयुर्वेदिक आधार होता. 'तुळशी वृंदावन जयाचे द्वारी।। धन्य तो प्राणी संसारी। तयाच्या पुण्या नाही सरी।। नित्य तो तुलसीस नमस्कारी।। त्यासी देखोनि यम पळे दुरी।। विष्णुदूत आदर करी।।' असे 'तुळशी माहात्म्य'मध्ये म्हटले आहे. साधारणत: १५-२0 वर्षांपूर्वीचा विचार केला, तर अंगणातील तुळशी वृंदावनासमोर महिला भगिनी दररोज तुळशीला पाणी घालत, प्रदक्षिणा घालून पूजा करीत असत. सायंकाळी दिवा लावला जायचा. अलीकडच्या काळात फ्लॅट संस्कृतीचा शिरकाव झाला. वाढत्या लोकसंख्येसाठी तरतूद म्हणून अपार्टमेंटसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. फ्लॅट संस्कृतीमध्ये दारासमोर अंगणच नसल्याने तुळशी वृंदावनाची संकल्पना बाजूला पडली. जुन्या काळी लोक घर बांधताना तुळशी वृंदावन आवर्जून उभारीत असत. अलीकडे तुळशीचे अंगणच हिरावून घेतले आहे. तुळशी वृंदावन संस्कृतीच आम्ही मोडीत काढली आहे.

*वृंदावन हरवलं अन् संस्कारही!

तुळशीचं वृंदावन तर हरवलंच, परंतु त्यासोबत लहान मुलांवरील संस्कारसुद्धा हरविले. घरातील आई, वडीलधारी माणसं सायंकाळी लहान मुलांना घेऊन तुळशीसमोर 'दिवा लागला तुळशीपाशी..', 'दिव्या दिव्या दीपत्कार..' यांसह धार्मिक श्लोक म्हणायला लावीत. अलीकडे हे सर्व नाहिसं झालं. वृंदावनासोबतच आमचे संस्कारसुद्धा हरवत चालले आहेत.

*आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य

वेद, पुराण, आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य सांगितले आहे. श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशी पानांनी विष्णूचे पूजन केले, तर व्रत, यज्ञ, जाप केल्याचे फळ लाभते. कृष्णपत्नी रुक्मिणीचा अवतार तुळस आहे, असे मानले जाते. म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह लावला जातो आणि या दिवसापासून विवाह मुहूर्त प्रारंभ होतात.