शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी प्रयत्न करा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:38 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.

अकोला: जे काही बदल होत असतात, ते स्वीकारणे कठीण जात असतात, त्याला मानवी अहंकार आडवा येतो. म्हणूनच कुणाला जाणवू न देता असे काही बदल करावे लागतात. जलसंधारण आणि सिंचनाच्या बाबतीतही काही चांगले बदल करण्यात येत आहेत. ते बदल स्वीकारले पाहिजे. शेतकरी त्यादृष्टीने प्रयत्न करतोय; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग, अकोलाच्यावतीने डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित दोन दिवसीय २० व्या राज्यस्तरीय महाराष्टÑ सिंचन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. मंचावर आंतरराष्टÑीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी सहकार्यवाह डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे औरंगाबाद, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुळकर्णी जळगाव, पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र जलतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, डॉ. बापू अडकिने, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. एम.बी. नागदेवे यांची उपस्थिती होती.धोेत्रे पुढे म्हणाले, रासायनिक खते, कीटकनाशकांनी शेतीची पोत बदलली असून, यामुळे पाण्याचे जमिनीत जलसंधारण होत नाही. म्हणूनच आता जमिनीची सुपीकता वाढविण्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. नलिका वितरण प्रणालीवर बोलताना ते म्हणाले, तात्पुरता फायदा बघण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांकडे बघणे गरजेचे आहे. कालव्याने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरीतील पातळी वाढते; परंतु पाइपने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरींना पाणी कसे येणार, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे. म्हणूनच कोणतेही व्यवस्थापन करा; पण ते परिपूर्ण, योग्य असावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे