शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बदलांचा स्वीकार करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:23 IST

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदरसिंग घुरा यांच्याशी बातचीत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जग झपाट्याने बदलत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून, सर्वच व्यवसायांमध्ये स्थित्यंतर होत आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही या क्षेत्रात होणारे बदल अंगीकारले पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदसिंग घुरा यांनी दिला आहे. ट्रान्सपोर्ट व मोटर्स व्यावसायिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अकोल्यात आलेल्या ७५ वर्षीय मोहिंदरसिंग घुरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रान्सपोर्ट व्यवसायातील विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. या व्यवसायातील बदलत्या स्वरूपाबाबत बोलताना ते म्हणाले, की इतर सर्वच व्यवसायांप्रमाणे ट्रान्सपोर्ट व्यवसायातही बदल घडत आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व वाहन मालकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अंगीकार केला पाहिजे. तसेच या व्यवसायाशी निगडित नियम व कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांची अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असेही घुरा म्हणाले.राज्य व देशाच्या विकासासाठी ट्रान्सपोर्ट महासंघाकडून सत्तेत असलेल्या सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. महासंघाचे ४ प्रमुख नियम असून, यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे सरकारला सहकार्य करणे हा आहे, असे घुरा यांनी बोलताना सांगितले. देशात वाहनचालकांची कमतरताभारतात वाहनचालकांची कमतरता असल्याचा दावा यावेळी घुरा यांनी केला. देशात वाहनचालकांची संख्या कमी असल्यामुळे ८० टक्के वाहनमालकांना स्वत:च त्यांची वाहने चालवावी लागत आहेत. जड वाहनांवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्यांनाही प्रशिक्षणार्थी परवाना जारी केला पाहिजे, जेणेकरून नवीन चालक तयार होतील, असे घुरा म्हणाले.आधार कार्डवर मिळावा जामीनअपघातप्रकरणी कारवाई झाल्यास वाहनचालकाला जामीन मिळविण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात आधार कार्डला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे चालकांना आधार कार्ड दाखवून जामीन मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा घुरा यांनी व्यक्त केली.चालकांची अपूर्ण झोप अपघाताचे मुख्य कारणमहामार्गांवर अपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण काय असावे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल घुरा यांनी अपूर्ण झोप हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. वाहनचालकांना ठरावीक मुदतीत दिलेल्या स्थळी पोहचावे लागते. यासाठी दिवस-रात्र एक करतात. रात्री पूर्ण झोप झाली नाही, तर वाहनचालकाला झोप येणे साहजिक आहे. त्यामुळेच महामार्गांवरील अपघात वाढत आहेत, असे घुरा म्हणाले.