शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बदलांचा स्वीकार करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:23 IST

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदरसिंग घुरा यांच्याशी बातचीत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जग झपाट्याने बदलत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून, सर्वच व्यवसायांमध्ये स्थित्यंतर होत आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही या क्षेत्रात होणारे बदल अंगीकारले पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदसिंग घुरा यांनी दिला आहे. ट्रान्सपोर्ट व मोटर्स व्यावसायिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अकोल्यात आलेल्या ७५ वर्षीय मोहिंदरसिंग घुरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रान्सपोर्ट व्यवसायातील विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. या व्यवसायातील बदलत्या स्वरूपाबाबत बोलताना ते म्हणाले, की इतर सर्वच व्यवसायांप्रमाणे ट्रान्सपोर्ट व्यवसायातही बदल घडत आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व वाहन मालकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अंगीकार केला पाहिजे. तसेच या व्यवसायाशी निगडित नियम व कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांची अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असेही घुरा म्हणाले.राज्य व देशाच्या विकासासाठी ट्रान्सपोर्ट महासंघाकडून सत्तेत असलेल्या सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. महासंघाचे ४ प्रमुख नियम असून, यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे सरकारला सहकार्य करणे हा आहे, असे घुरा यांनी बोलताना सांगितले. देशात वाहनचालकांची कमतरताभारतात वाहनचालकांची कमतरता असल्याचा दावा यावेळी घुरा यांनी केला. देशात वाहनचालकांची संख्या कमी असल्यामुळे ८० टक्के वाहनमालकांना स्वत:च त्यांची वाहने चालवावी लागत आहेत. जड वाहनांवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्यांनाही प्रशिक्षणार्थी परवाना जारी केला पाहिजे, जेणेकरून नवीन चालक तयार होतील, असे घुरा म्हणाले.आधार कार्डवर मिळावा जामीनअपघातप्रकरणी कारवाई झाल्यास वाहनचालकाला जामीन मिळविण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात आधार कार्डला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे चालकांना आधार कार्ड दाखवून जामीन मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा घुरा यांनी व्यक्त केली.चालकांची अपूर्ण झोप अपघाताचे मुख्य कारणमहामार्गांवर अपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण काय असावे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल घुरा यांनी अपूर्ण झोप हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. वाहनचालकांना ठरावीक मुदतीत दिलेल्या स्थळी पोहचावे लागते. यासाठी दिवस-रात्र एक करतात. रात्री पूर्ण झोप झाली नाही, तर वाहनचालकाला झोप येणे साहजिक आहे. त्यामुळेच महामार्गांवरील अपघात वाढत आहेत, असे घुरा म्हणाले.