शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

टोइंग पथकाने उचलल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

By admin | Updated: July 7, 2017 01:40 IST

रेल्वे स्थानक : शाब्दीक चकमकीनंतर खाली उतरवल्या गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्थानकावर खासदार संजय धोत्रे हे प्रवाशांचा जनता दरबार घेत असताना टोइंग पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मोटारसायकली उचलल्या. गाड्या खाली उतरवण्याच्या मुद्यावरून कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी केली. खासदार, आमदार आणि महापौरांसमोर कंत्राटदाराची माणसे आणि ट्रॅफिक पोलिसांनी नियम धाब्यावर बसविल्याने येथे वीस मिनिटे शाब्दीक चकमक झाली. कारवाई फसल्याची जाणीव टोइंग पथकाला झाल्याने त्यांनी जप्त केलेल्या सर्व गाड्या खाली उतरवल्या. या निमित्ताने सत्तापक्षातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना टोइंग पथकाची किती दादागिरी आहे याचा अनुभव गुरुवारी आला.रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदारांनी गुरूवारी प्रवाशांच्या समस्या जाणनू घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपामधील अनेक पदाधिकारी रेल्वे स्थानकावर जमले होते. या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोटारसायकली स्थानकाच्या समोरच्या बाजूला ठेवल्या होत्या. भाजप पदाधिकारी रेल्वे स्थानकाची पाहणी करीत खासदारांसमवेत रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या दादऱ्यावरून उतरून खाली आले. तेवढ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना टोइंग पथक गाड्या उचलताना दिसलेत. पदाधिकाऱ्यांच्या गाड्या उचलून एमएच ३० एबी ३४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकल्या जात असल्याचे पाहून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कारवाई थांबविण्याचे सांगितले. मात्र, ट्रकमध्ये बसलेल्या ट्रॅफिक पोलिसासह कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी करत दूचाकी उचलण्याचा प्रकार सुूरच ठेवला. हा सर्व प्रकार खासदार, आमदार, महापौर आणि पदाधिकाऱ्यांसमोर घडत होता. कंत्राटदाराची माणसांसोबतची वादावादी वाढल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार थांबविला व सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या खाली उतरवण्यात आल्या.‘जीआरपीएफ’च्या हद्दीत शहर वाहतूक शाखा कशी?अकोला रेल्वे स्थानक परिसरातून मोटारसायकल चोरीला गेली, तर शहरातील पोलीस विभाग आपल्या ठाण्याची हद्द दाखवून तक्रार स्वीकारत नाहीत. तेव्हा सीमेचा नियम दिसतो आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस टोइंग पथकाला घेऊन जेव्हा हे पोलिस रेल्वेस्थानक परिसरातील मोटारसायकली उचलतात, तेव्हा नियम कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक शाखा- महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात होणारी टोइंग पथकाची दादागिरी वाहतूक नियंत्रणापेक्षा अकोलेकरांना बळजबरी लुटणारीच सिद्ध होत असतानादेखील येथील लोकप्रतिनिधी त्याबद्दल ब्र शब्द काढत नाहीत, याचे नवल वाटते.