शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टोइंग पथकाने उचलल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

By admin | Updated: July 7, 2017 01:40 IST

रेल्वे स्थानक : शाब्दीक चकमकीनंतर खाली उतरवल्या गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्थानकावर खासदार संजय धोत्रे हे प्रवाशांचा जनता दरबार घेत असताना टोइंग पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मोटारसायकली उचलल्या. गाड्या खाली उतरवण्याच्या मुद्यावरून कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी केली. खासदार, आमदार आणि महापौरांसमोर कंत्राटदाराची माणसे आणि ट्रॅफिक पोलिसांनी नियम धाब्यावर बसविल्याने येथे वीस मिनिटे शाब्दीक चकमक झाली. कारवाई फसल्याची जाणीव टोइंग पथकाला झाल्याने त्यांनी जप्त केलेल्या सर्व गाड्या खाली उतरवल्या. या निमित्ताने सत्तापक्षातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना टोइंग पथकाची किती दादागिरी आहे याचा अनुभव गुरुवारी आला.रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदारांनी गुरूवारी प्रवाशांच्या समस्या जाणनू घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपामधील अनेक पदाधिकारी रेल्वे स्थानकावर जमले होते. या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोटारसायकली स्थानकाच्या समोरच्या बाजूला ठेवल्या होत्या. भाजप पदाधिकारी रेल्वे स्थानकाची पाहणी करीत खासदारांसमवेत रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या दादऱ्यावरून उतरून खाली आले. तेवढ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना टोइंग पथक गाड्या उचलताना दिसलेत. पदाधिकाऱ्यांच्या गाड्या उचलून एमएच ३० एबी ३४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकल्या जात असल्याचे पाहून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कारवाई थांबविण्याचे सांगितले. मात्र, ट्रकमध्ये बसलेल्या ट्रॅफिक पोलिसासह कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी करत दूचाकी उचलण्याचा प्रकार सुूरच ठेवला. हा सर्व प्रकार खासदार, आमदार, महापौर आणि पदाधिकाऱ्यांसमोर घडत होता. कंत्राटदाराची माणसांसोबतची वादावादी वाढल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार थांबविला व सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या खाली उतरवण्यात आल्या.‘जीआरपीएफ’च्या हद्दीत शहर वाहतूक शाखा कशी?अकोला रेल्वे स्थानक परिसरातून मोटारसायकल चोरीला गेली, तर शहरातील पोलीस विभाग आपल्या ठाण्याची हद्द दाखवून तक्रार स्वीकारत नाहीत. तेव्हा सीमेचा नियम दिसतो आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस टोइंग पथकाला घेऊन जेव्हा हे पोलिस रेल्वेस्थानक परिसरातील मोटारसायकली उचलतात, तेव्हा नियम कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक शाखा- महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात होणारी टोइंग पथकाची दादागिरी वाहतूक नियंत्रणापेक्षा अकोलेकरांना बळजबरी लुटणारीच सिद्ध होत असतानादेखील येथील लोकप्रतिनिधी त्याबद्दल ब्र शब्द काढत नाहीत, याचे नवल वाटते.