शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

भूताची भीती ठासून भरण्याचे काम परंपरेने केले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 03:24 IST

दिलीप सोळंके : अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अज्ञानी प्रथा अन् पिढीजात चालत आलेल्या परंपरेने भूताची भीती मानवी मेंदूत ठासून भरली आहे. त्यामुळे जगात कुठेही अस्तीत्वात नसलेल्या भूताची भीती आहे. व्यक्तीच्या अव्यक्त मनातून ही भीती काढली तर व्यक्ती भूतमुक्त होऊ शकते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी केले. गोरक्षण मार्गावरील साई कृपा मंगल कार्यालयात अंनिसच्या महानगर शाखेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सोळंके रविवारी दुपारी बोलत होते. नैसर्गीक अडचण, उपाय, अनुकरण, दीर्घ अनुकरणातून प्रथा- परंपरा, आणि त्यातून अंधश्रध्देचा जन्म होतो. अंधश्रध्देतून भूत निर्माण होतात. जे सत्य नाही तरी ते सत्य आहे, हे डोळे बंद करून पीढीजात स्वीकारले जाते. व्यक्ती प्रचंड रागात असली की मेंदूमधील व्यक्त कप्पा बंद होतो आणि त्याच वेळी अव्यक्त कप्पा उघडा होतो. या कप्प्यात गेलेल्या एखाद्या सूचनेने व्यक्ती तंतोतंत पालन करते, रागाच्या भरात जवळच्या व्यक्तींच्या हत्त्या अशाच प्रकारे घडतात. म्हणून रागात निर्णय घेऊ नये असे मानसशास्त्रात सांगितले आहे.अज्ञातून निर्णाण झालेल्या भीतीपोटी आपल्या अव्यक्त मनात अंधश्रध्दा मुक्कामी आहेत, त्यांना हुसकावून लावणे म्हणजे अंधश्रध्दा निमूर्लन होय, असेही सोळंके याप्रसंगी बोलले.यावेळी डॉ. हर्षवर्धन मालोकर राज्य प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे ,बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख अशोक घाटे ,शरद वानखडे,महानगर संघटक चंद्रकांत झटाले ,सचिव मंगेश वानखडे उपस्थित होते.उदघाटन सत्रात डॉ.हर्षवर्धन मालोकार यांनी देवापुढे नारळ का फोडले जाते याबद्दल बोलताना मानवी डोके आणि नारळ यातील विविध साम्य सुंदर उलगडून सांगितली,रूढी,परंपरा यांची प्रत्येकाने चिकित्सा केली तरच ज्ञान प्राप्त होईल असेही मालोकार यावेळी म्हणाले.अंनिसचा देवधमार्ला विरोध नाही मात्र त्या नावावर लोकांचे शोषण करणार्या बुवा,बाबा,मांत्रिक यांचा विरोध करते ,ही भूमिका म्हणजे पळवाट नव्हे तर जाणीवपूर्वक स्वीकारली आहे,कारण अंधश्रद्धेचे मूळ देव ,धर्म नाही आधी अंधश्रद्धा तयार झाल्या अशी माहिती आवारे यांनी देऊन स्वत:मध्ये बदल घडण्याची इच्छा असणार््या प्रत्येकाने या चळवळीत यावे असे आवाहन प्रास्ताविकात केले.दुपारच्या सत्रात भूत आणि भूतांचे मानसशास्त्र, संत आणि चमत्कार, या विषयावर मार्गदर्शन करताना कोणत्याही संताने चमत्कार केले नाहीत. शेवटच्या सत्रात अशोक घाटे यांनी मंत्राने यज्ञ पेटविणे, नारळातून देवीचा खण काढणे, हवेतून अंगारा, वस्तू काढणे, जिभेवर कापूर जाळणे, हातातून गुलाल काढणे आदी चमत्कार करून दाखवून त्यामागील विज्ञान, हातचलाखी समजावून सांगितली. शिबिराला शहरातील १६० कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी महानगर उपाध्यक्ष दिगंबर सांगळे, कोषाध्यक्ष विजय बुरुकले, प्रसिद्धिप्रमुख भारत इंगोले, जिल्हा सचिव संतोष टाले, तनुश्री भोसले, आशा उगवेकर, प्रेमदास राठोड, विठ्ठल तायडे, अश्विनी देशमुख, शेषराव गव्हाळे, संध्या देशमुख, विठ्ठल तायडे, धम्मदीप इंगळे, महेंद्र काळे, भवते, युवा अंनिसचे हरीश आवारे, विकास मस्के यांनी परिश्रम घेतले.