शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

भूताची भीती ठासून भरण्याचे काम परंपरेने केले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 03:24 IST

दिलीप सोळंके : अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अज्ञानी प्रथा अन् पिढीजात चालत आलेल्या परंपरेने भूताची भीती मानवी मेंदूत ठासून भरली आहे. त्यामुळे जगात कुठेही अस्तीत्वात नसलेल्या भूताची भीती आहे. व्यक्तीच्या अव्यक्त मनातून ही भीती काढली तर व्यक्ती भूतमुक्त होऊ शकते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी केले. गोरक्षण मार्गावरील साई कृपा मंगल कार्यालयात अंनिसच्या महानगर शाखेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सोळंके रविवारी दुपारी बोलत होते. नैसर्गीक अडचण, उपाय, अनुकरण, दीर्घ अनुकरणातून प्रथा- परंपरा, आणि त्यातून अंधश्रध्देचा जन्म होतो. अंधश्रध्देतून भूत निर्माण होतात. जे सत्य नाही तरी ते सत्य आहे, हे डोळे बंद करून पीढीजात स्वीकारले जाते. व्यक्ती प्रचंड रागात असली की मेंदूमधील व्यक्त कप्पा बंद होतो आणि त्याच वेळी अव्यक्त कप्पा उघडा होतो. या कप्प्यात गेलेल्या एखाद्या सूचनेने व्यक्ती तंतोतंत पालन करते, रागाच्या भरात जवळच्या व्यक्तींच्या हत्त्या अशाच प्रकारे घडतात. म्हणून रागात निर्णय घेऊ नये असे मानसशास्त्रात सांगितले आहे.अज्ञातून निर्णाण झालेल्या भीतीपोटी आपल्या अव्यक्त मनात अंधश्रध्दा मुक्कामी आहेत, त्यांना हुसकावून लावणे म्हणजे अंधश्रध्दा निमूर्लन होय, असेही सोळंके याप्रसंगी बोलले.यावेळी डॉ. हर्षवर्धन मालोकर राज्य प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे ,बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख अशोक घाटे ,शरद वानखडे,महानगर संघटक चंद्रकांत झटाले ,सचिव मंगेश वानखडे उपस्थित होते.उदघाटन सत्रात डॉ.हर्षवर्धन मालोकार यांनी देवापुढे नारळ का फोडले जाते याबद्दल बोलताना मानवी डोके आणि नारळ यातील विविध साम्य सुंदर उलगडून सांगितली,रूढी,परंपरा यांची प्रत्येकाने चिकित्सा केली तरच ज्ञान प्राप्त होईल असेही मालोकार यावेळी म्हणाले.अंनिसचा देवधमार्ला विरोध नाही मात्र त्या नावावर लोकांचे शोषण करणार्या बुवा,बाबा,मांत्रिक यांचा विरोध करते ,ही भूमिका म्हणजे पळवाट नव्हे तर जाणीवपूर्वक स्वीकारली आहे,कारण अंधश्रद्धेचे मूळ देव ,धर्म नाही आधी अंधश्रद्धा तयार झाल्या अशी माहिती आवारे यांनी देऊन स्वत:मध्ये बदल घडण्याची इच्छा असणार््या प्रत्येकाने या चळवळीत यावे असे आवाहन प्रास्ताविकात केले.दुपारच्या सत्रात भूत आणि भूतांचे मानसशास्त्र, संत आणि चमत्कार, या विषयावर मार्गदर्शन करताना कोणत्याही संताने चमत्कार केले नाहीत. शेवटच्या सत्रात अशोक घाटे यांनी मंत्राने यज्ञ पेटविणे, नारळातून देवीचा खण काढणे, हवेतून अंगारा, वस्तू काढणे, जिभेवर कापूर जाळणे, हातातून गुलाल काढणे आदी चमत्कार करून दाखवून त्यामागील विज्ञान, हातचलाखी समजावून सांगितली. शिबिराला शहरातील १६० कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी महानगर उपाध्यक्ष दिगंबर सांगळे, कोषाध्यक्ष विजय बुरुकले, प्रसिद्धिप्रमुख भारत इंगोले, जिल्हा सचिव संतोष टाले, तनुश्री भोसले, आशा उगवेकर, प्रेमदास राठोड, विठ्ठल तायडे, अश्विनी देशमुख, शेषराव गव्हाळे, संध्या देशमुख, विठ्ठल तायडे, धम्मदीप इंगळे, महेंद्र काळे, भवते, युवा अंनिसचे हरीश आवारे, विकास मस्के यांनी परिश्रम घेतले.