शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

By atul.jaiswal | Updated: April 2, 2018 16:01 IST

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली.

ठळक मुद्देटॉवरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली.यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली.

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. दरम्यान पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतकऱ्यांजवळ जाऊन त्यांचे म्हणने एकुण घेतले व यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली.महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या टॉवरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाय टेन्शन लाईन मुळे भविष्यात सुद्धा नापिकी होण्याची शक्यता आहे. शासनाच्या ३१ मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार अपेक्षित पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम देण्याची मागणी शेतकºयांनी लावून धरली आहे. यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यां नी यापुर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सोमवार, २ एप्रिल रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात धाव घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाढाचा वाचला. पालकमंत्री डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यां चे म्हणने ऐकून घेतले व यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल असा शब्द दिला. शेतकऱ्यां चे दोन प्रतिनिधी व युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उपस्थितीत उर्जामंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नंतर शेतकऱ्यां नी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झुनका भाकरीचा आस्वाद घेतला.या वेळी शेतकरी दीपक सरप, किसन गव्हाळे, जानराव अंभोरे, गंगाधर सरप, कोकिला सरप, अरुण अंभोरे, दिनेश गवई, रामभाऊ कळंब, गोविंदराव घाटोळ, प्रल्हाद भटकर, गुलाम जाफर, गुलाम हुसेन, गुलाम जाकीर,गुलाम मोईन,अरुण मसने,वासुदेव सरप,श्रीराम हाडोळे, मंगेश धनोकार,केशव नावकार, ज्ञानदेव डोंगरे, शेख शब्बीर, शेख करीम, तोताराम धमार्ळे, महेबूब खान, विलास मानकर, जानराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनेश गवई, किसण गव्हाळे, पुंडलिक पुंडकर, गजानन जुमळे, नितीन सरप,नारायण उमाळे, कमलाबाई खोडके, रामकृष्ण सरप, आशाबाई सरप, वासुदेव सरप,शेख मुस्तफा, प्रकाश खंडारे, महेंद्र मंगलकर, गोकणार्बाई ढोरे,शेख सादिक,तोताराम धमार्ळे,दुगार्बाई भटकर, संजय कातखेडे,सरस्वती वाडकर, गुलाबराव जंजाळ, चंद्रभान डोंगरे,नारायण भूम्बरे, सुनंदा भूम्बरे, वैभव धमार्ळे आदी शेतकर्?्यांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख नितीन मिश्रा,जिल्हा समन्वयक निखील ठाकुर,सागर चव्हाण,आकाश बोराळे,रणजीत गावंडे,प्रतिक देशमुख,सौरभ नागोशे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयguardian ministerपालक मंत्री