शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

तुरीची नोंदणी, खरेदी बंद ;  मार्केटिंग फेडरेशनने दिले 'खविसं'ला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:11 IST

अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीने गेल्या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठीची मुदत १८ एप्रिल रोजी संपल्याने, त्यानंतर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करू नये, केल्यास जबाबदारी आपल्या संस्थेची राहील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सर्वच खरेदी केंद्राची जबाबदारी असलेल्या खरेदी विक्री संघाला दिले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत सर्वच केंद्रात १ लाख ४० हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती आहे.ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली मात्र, खरेदी झाली नाही, असे ४० हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीने गेल्या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठीची मुदत १८ एप्रिल रोजी संपल्याने, त्यानंतर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करू नये, केल्यास जबाबदारी आपल्या संस्थेची राहील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सर्वच खरेदी केंद्राची जबाबदारी असलेल्या खरेदी विक्री संघाला दिले आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांची नोंदणी असताना त्यांची तूर खरेदी शिल्लक असल्याची माहिती आहे.आधारभूत किंमत योजनेतून २०१७-१८ या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठी नाफेडने महाराष्ट्र स्टेट को-आॅप. मार्के टिंग फेडरेशन या संस्थेला काम दिले. फेडरेशनने तालुका खरेदी विक्री संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रात तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकऱ्यांना आधीच आॅनलाइन नोंदणी करण्याची पद्धत सुरू झाली. नोंदणी केलेल्या शेतकºयांना मेसेजद्वारे केंद्रात तूर आणण्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार शेतकºयांनी तूर विकण्यासाठी कागदपत्रावरील नोंदीसह नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत सर्वच केंद्रात १ लाख ४० हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली मात्र, खरेदी झाली नाही, असे ४० हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच आता १८ एप्रिलला तुरीची नोंद व खरेदी दोन्ही प्रक्रिया बंद झाल्याने त्या शेतकºयांच्या तूर खरेदीबाबत शासनाकडून कोणते आदेश दिले जातात, याची प्रतीक्षा शेतकºयांसह संबंधित यंत्रणेला आहे. ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या ४० हजार शेतकºयांची तूर खरेदी अद्याप शिल्लक आहे. त्याबाबत शासनाकडून पुढील निर्देशाची प्रतीक्षा आहे.- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती