शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचा आज ‘सर्जिकल स्ट्राइक’; यशवंत सिन्हा करणार नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:46 IST

देशाच्या जवानांनी पाकिस्तानातून जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचप्रमाणे सोमवारी ४ डिसेंबर रोजी आपल्या मागण्यांसाठी जिल्हय़ातील शेतकरी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करतील, अशी घोषणा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी रविवारी अकोल्यात केली. 

ठळक मुद्देगांधी-जवाहर बागेतून सकाळी १0 ला सुरूवात होणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाच्या जवानांनी पाकिस्तानातून जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचप्रमाणे सोमवारी ४ डिसेंबर रोजी आपल्या मागण्यांसाठी जिल्हय़ातील शेतकरी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करतील, अशी घोषणा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी रविवारी अकोल्यात केली. शेतकरी जागर मंचातर्फे आयोजित कासोधा परिषदेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, दत्ताजी पवार, दादाराव पाथ्रीकर, काशीराम साबळे, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रा. अजहर हुसैन, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, रवी अरबट, मनोज तायडे, ज्ञानेश्‍वर सुलताने, विजय देशमुख, रवी पाटील अरबट, दिनकर वाघ, शेख अन्सार, सय्यद वासिफ, शेख अन्सार, दिवाकर देशमुख, टिना देशमुख आदी होते. मार्गदर्शन करताना यशवंत सिन्हा म्हणाले, भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्‍यांवरील अन्याय आम्ही दूर करू व शेतमालाला हमीभाव देऊ, असे वचन दिले होते; परंतु शेतकर्‍यांचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला. शेतकर्‍यांवरील अन्याय तर दूर झालाच नाही, उलट शेतकर्‍यांसमोरील समस्या वाढल्या. शेतमालाची किमान आधारभूत किंमत ठरवून दिलेली आहे, असे असतानाही शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळत नाही. सरकारला आधारभूत किमतीने शेतमालाची खरेदी करण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न करून यशवंत सिन्हा यांनी देशभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.आता देशभरातील शेतकर्‍यांना आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून करायचे आहे. आर्थिक विकासाचा दर किंचित वाढला. त्याचा आनंद मोदी सरकार साजरा करते, याचेच आश्‍चर्य वाटते. स्वातंत्र्यापासून शेतकर्‍यांची लूट होत आहे. आता शेतकर्‍यांसाठी आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. आमच्या जवानांनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तसाच सर्जिकल स्ट्राइक शेतकरी मोदी सरकारविरुद्ध अकोल्यात करतील, अशी घोषणा त्यांनी केली. कासोधा परिषदेचे प्रास्ताविक प्रशांत गावंडे यांनी तर संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले. 

तोपर्यंत अकोल्यातून जाणार नाही!शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अकोल्यातून जाणार नाही. शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकार्‍यांनासुद्धा मी सांगितले, की माझे येण्याचे रेल्वे तिकीट काढा; परंतु जाण्याचे काढू नका. शेतकर्‍यांना न्याय मिळाल्यावरच मी अकोल्यातून जाईल, असेही माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले. 

आमदार, पालकमंत्र्यांमध्ये स्पर्धा - मुरूमकार अध्यक्षीय भाषण करताना, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार यांनी, भाजपचे नेते जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहतात आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चढाओढ करतात. येथील आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश देण्यासाठी स्पर्धा लागत असल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांच्या समस्या, त्यांच्या मागण्यांचा जिल्हय़ातील एकही लोकप्रतिनिधी विचार करीत नाही. विधिमंडळामध्ये शेतकर्‍यांच्या समस्यांविषयी भांडताना दिसत नाहीत; परंतु श्रेय लाटायला मात्र, सर्वच चढाओढ करतात, असेही मुरूमकार यांनी सांगितले. 

आंदोलनासाठी शेतकर्‍यांकडून निधीशेतकरी जागर मंचाच्या कासोधा परिषद व पुढील आंदोलनासाठी सर्मपण निधी संकलनासाठी सभा मंडपात टोपले ठेवण्यात आले होते. या टोपल्यांमध्ये परिषदेसाठी आलेल्या शेतकर्‍यांनी यथाशक्ती निधी टाकला. - 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाAkola cityअकोला शहर