शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:41 IST

कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून, त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची, याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २0१७ पूर्वी शेतकर्‍यांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २0१७ ते डिसेंबर २0१८ पर्यंत पाच हप्त्यांत किती रक्कम भरावी लागणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यात महावितरणकडून ३0 हजार रुपयांच्या आत थकबाकी असणार्‍या ग्राहकांना पाच सुलभ हप्ते तर ३0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांना १0 सुलभ हप्ते मिळणार आहेत. जे शेतकरी अद्याप या योजनेत सहभागी झाले नाहीत, त्यांनी घाई करून योजनेत विनाविलंब सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

५४ हजार शेतकर्‍यांकडे २५0 कोटींची थकबाकीजिल्हय़ातील तब्बल ५४ हजार १३२ शेतकर्‍यांकडे महावितरणची देयकापोटीची एकूण थकबाकी २५0 कोटी ३४ लाख रुपये एवढी आहे. यापैकी १३६ कोटी ९५ लाख एवढी मूळ थकबाकी असून, त्यावर १११ कोटी ५५ लाख रुपये एवढे व्याज असून, दंडापोटीची रक्कम १ कोटी ८४ लाख एवढी आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी शेतकर्‍यांना फक्त मूळ थकबाकी भरावी लागणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती