शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:41 IST

कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून, त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची, याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २0१७ पूर्वी शेतकर्‍यांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २0१७ ते डिसेंबर २0१८ पर्यंत पाच हप्त्यांत किती रक्कम भरावी लागणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यात महावितरणकडून ३0 हजार रुपयांच्या आत थकबाकी असणार्‍या ग्राहकांना पाच सुलभ हप्ते तर ३0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांना १0 सुलभ हप्ते मिळणार आहेत. जे शेतकरी अद्याप या योजनेत सहभागी झाले नाहीत, त्यांनी घाई करून योजनेत विनाविलंब सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

५४ हजार शेतकर्‍यांकडे २५0 कोटींची थकबाकीजिल्हय़ातील तब्बल ५४ हजार १३२ शेतकर्‍यांकडे महावितरणची देयकापोटीची एकूण थकबाकी २५0 कोटी ३४ लाख रुपये एवढी आहे. यापैकी १३६ कोटी ९५ लाख एवढी मूळ थकबाकी असून, त्यावर १११ कोटी ५५ लाख रुपये एवढे व्याज असून, दंडापोटीची रक्कम १ कोटी ८४ लाख एवढी आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी शेतकर्‍यांना फक्त मूळ थकबाकी भरावी लागणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती