शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:41 IST

कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून, त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची, याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २0१७ पूर्वी शेतकर्‍यांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २0१७ ते डिसेंबर २0१८ पर्यंत पाच हप्त्यांत किती रक्कम भरावी लागणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यात महावितरणकडून ३0 हजार रुपयांच्या आत थकबाकी असणार्‍या ग्राहकांना पाच सुलभ हप्ते तर ३0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांना १0 सुलभ हप्ते मिळणार आहेत. जे शेतकरी अद्याप या योजनेत सहभागी झाले नाहीत, त्यांनी घाई करून योजनेत विनाविलंब सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

५४ हजार शेतकर्‍यांकडे २५0 कोटींची थकबाकीजिल्हय़ातील तब्बल ५४ हजार १३२ शेतकर्‍यांकडे महावितरणची देयकापोटीची एकूण थकबाकी २५0 कोटी ३४ लाख रुपये एवढी आहे. यापैकी १३६ कोटी ९५ लाख एवढी मूळ थकबाकी असून, त्यावर १११ कोटी ५५ लाख रुपये एवढे व्याज असून, दंडापोटीची रक्कम १ कोटी ८४ लाख एवढी आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी शेतकर्‍यांना फक्त मूळ थकबाकी भरावी लागणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती