शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘नाफेड’द्वारे तूर खरेदीचे चुकारे थकले!

By admin | Updated: May 2, 2017 01:40 IST

अकोला- जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली; मात्र २० दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या तुरीचे २५ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप थकीत आहेत.

२५ कोटींचे चुकारे : शेतकऱ्यांना प्रतीक्षा

संतोष येलकर - अकोलाहमी दराने ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली; मात्र २० दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या तुरीचे २५ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप थकीत आहेत. त्यामुळे विकलेल्या तुरीचे चुकारे केव्हा होणार, याबाबत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने जिल्ह्यात ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर आणि अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असतानाच गत २२ एप्रिलपासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने मोजमाप बाकी असलेली तूर कुठे आणि कोणाला विकणार, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर खरेदी केद्रांवरील तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार हमी दराने खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु ‘नाफेड’द्वारे खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे गत २० दिवसांपासून थकीत आहेत. जिल्ह्यात पाचही खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत २ लाख ४५ हजार ५०० क्विंटल तूर ‘नाफेड’द्वारे खरेदी करण्यात आली. त्यापैकी गत ९ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे करण्यात आले असले तरी, १० एप्रिलपासून २२ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे २५ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप थकीत आहेत. विकलेल्या तुरीची रक्कम केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. नाफेडद्वारे तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा व बार्शीटाकळी या तीन खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत १ लाख ५८ हजार ५०० क्विंटल ८० कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी १० एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे ६० कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे करण्यात आले. १० एप्रिलनंतर खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे बाकी आहेत.-मनोज वाजपेयी, जिल्हा मार्केर्टिंग अधिकारी