शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

राज्यात बियाणे, खताचा पुरवठा वेळेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:22 IST

‘लॉकडाऊन’ संपताच सर्वत्र हा पुरवठा केला जाणार आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असून, दक्षता घेतली जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’ संचारबंदी लावण्यात आली आहे. या स्थितीत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाने बियाणे, खताचे नियोजन केले आहे. ‘लॉकडाऊन’ संपताच सर्वत्र हा पुरवठा केला जाणार आहे. राज्यात खताचे रॅक पाठविण्यात येत आहेत. मलकापूरला १,५०० मेट्रिक टन खताचा रॅक खाली करण्यात आला आहे. राज्यात येत्या खरीप हंगामात १ कोटी ३२ लाख हेक्टरचे नियोजन कृषी आयुक्तालयाने केले असून, त्यासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयांतर्गत महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाकडून ५ लाख २८ हजार ५०९ क्विंटल आणि राष्ट्रीय बियाणे (एनएससी) महामंडळाचे २७ हजार २६५ क्विंटल असे ५ लाख ५५ हजार ७७४ क्विंटल बियाण्यांचे हे नियोजन आहे. सद्यस्थिीत बियाणे प्रक्रिया सुरू आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये कृषी मालाच्या वाहतुकीस परवानगी आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व बियाणे बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत कृषी आयुक्तालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खते वाहतुकीची परवागी असल्याने बियाणे उद्योगांजकांना बियाणे पोहोेचविण्याची मोकळीक आहे. दरम्यान, जगावर कोरोनासारखे मोठे संकट आले आहे. देशातही कोरोनाचा प्रसार वाढला आहे. तो थांबविण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहे. देशात ‘लॉकडाऊन’ आहे. अशाही परिस्थिती शेतकºयांना बियाणे मिळावे, यासाठी राज्यात बियाणे प्रक्रियांवर भर दिला जात आहे. मजुरांची या काळात टंचाई आहेच. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना बियाणे, खतांची टंचाई भासणार नाही, याकडे सध्या कृषी आयुक्तालय लक्ष ठेवून आहे.  शेतकºयांना वेळेवर खते, बियाणे देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याची वाहतूक करण्यासाठी परवागी देण्यात आली आहे. मे महिन्याच्या प्रथम व दुसºया आठवड्यात शेतकºयांपर्यंत पुरवठा करण्यात येणार आहे.

- सुहास दिवसे, आयुक्त कृषी (आयएएस), पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी