शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील वाघांचा संचार वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:15 IST

अकोला: मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे.

- राजेश शेगोकारअकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पिंप्री जैनपूर, पिंप्री खुर्द शेतशिवारात मंगळवारी वाघ आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावाजवळील केळीच्या शेतात वाघोबा चक्क दिवसभर ठाण मांडून बसले होते. या पृष्ठभूमीवर मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनवर्सन झाल्याने वाघाला मोकळा श्वास मिळाला हे जरी खरे असले तरी वाघांचा संचार चिंता वाढविणारा आहे.मेळघाटातील अंबाबरवा व संलग्नित वनगावांचे यशस्वी पुनवर्सन झाल्याने काही प्रमाणात वाघांचा संचार मार्ग मोकळा झाला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे असलेल्या माहितीवरून या क्षेत्रात तब्बल ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांचे बछडे आहेत. व्याघ्र अधिवासात शिकारीची कमतरता भासली म्हणून वाघ त्यांच्या क्षेत्राबाहेर येतात. प्रादेशिक वनक्षेत्रातील वन जमिनीवर वाढणारे अतिक्रमण, विकास प्रकल्प, अवैध गुरे चराई, रस्त्यांचा विकास, वाढती शिकार, संचार मार्गाचा होणारा ºहास अशा कारणामुळे जंगलांची अवस्था बिकट होत आहे. म्हणून वाघांचा आणि मानवांचा संघर्ष होताना आपण पाहतो आहे. एकीकडे गेल्या वर्षभरात व्याघ्र हल्ल्यात भारतात सर्वाधिक माणसांचे मृत्यू १५ विदर्भात झाले असताना दुसरीकडे २० वाघांना आपला जीवही गमवावा लागला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बुलडाणा जिह्यातील अंबाबरवा अभयारण्य हा अतिशय महत्त्वाचा संचार मार्ग आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्र व यावल अभयारण्य, पुढे अकोला जिल्ह्यातील वान अभयारण्य, उत्तरेकडे रावेर वनक्षेत्र मार्गे यावल तर पुढे अनेरडॅम (धुळे) अभयारण्याशी हे क्षेत्र जोडलेले आहे. मेळघाटमधील वाघ वान, अंबाबरवा मार्गे वडोदा वनक्षेत्रात संचार करतात. त्यामुळेच वाघांचे शितशिवारात दर्शन वाढले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वाघ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. वाघ टिकला तरच अन्नसाखळी व परिसंस्था समृद्ध राहते. आपण वाघाला मोकळा श्वास दिला पाहिजे. गावालगत वाघांचे दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण होते; मात्र त्यासाठी वन विभागाची मदत घेऊन उपाय शोधणे गरजेचे आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती.

टॅग्स :AkolaअकोलाMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघ