शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

मेळघाटातील वाघांचा संचार वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:15 IST

अकोला: मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे.

- राजेश शेगोकारअकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पिंप्री जैनपूर, पिंप्री खुर्द शेतशिवारात मंगळवारी वाघ आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावाजवळील केळीच्या शेतात वाघोबा चक्क दिवसभर ठाण मांडून बसले होते. या पृष्ठभूमीवर मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनवर्सन झाल्याने वाघाला मोकळा श्वास मिळाला हे जरी खरे असले तरी वाघांचा संचार चिंता वाढविणारा आहे.मेळघाटातील अंबाबरवा व संलग्नित वनगावांचे यशस्वी पुनवर्सन झाल्याने काही प्रमाणात वाघांचा संचार मार्ग मोकळा झाला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे असलेल्या माहितीवरून या क्षेत्रात तब्बल ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांचे बछडे आहेत. व्याघ्र अधिवासात शिकारीची कमतरता भासली म्हणून वाघ त्यांच्या क्षेत्राबाहेर येतात. प्रादेशिक वनक्षेत्रातील वन जमिनीवर वाढणारे अतिक्रमण, विकास प्रकल्प, अवैध गुरे चराई, रस्त्यांचा विकास, वाढती शिकार, संचार मार्गाचा होणारा ºहास अशा कारणामुळे जंगलांची अवस्था बिकट होत आहे. म्हणून वाघांचा आणि मानवांचा संघर्ष होताना आपण पाहतो आहे. एकीकडे गेल्या वर्षभरात व्याघ्र हल्ल्यात भारतात सर्वाधिक माणसांचे मृत्यू १५ विदर्भात झाले असताना दुसरीकडे २० वाघांना आपला जीवही गमवावा लागला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बुलडाणा जिह्यातील अंबाबरवा अभयारण्य हा अतिशय महत्त्वाचा संचार मार्ग आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्र व यावल अभयारण्य, पुढे अकोला जिल्ह्यातील वान अभयारण्य, उत्तरेकडे रावेर वनक्षेत्र मार्गे यावल तर पुढे अनेरडॅम (धुळे) अभयारण्याशी हे क्षेत्र जोडलेले आहे. मेळघाटमधील वाघ वान, अंबाबरवा मार्गे वडोदा वनक्षेत्रात संचार करतात. त्यामुळेच वाघांचे शितशिवारात दर्शन वाढले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वाघ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. वाघ टिकला तरच अन्नसाखळी व परिसंस्था समृद्ध राहते. आपण वाघाला मोकळा श्वास दिला पाहिजे. गावालगत वाघांचे दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण होते; मात्र त्यासाठी वन विभागाची मदत घेऊन उपाय शोधणे गरजेचे आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती.

टॅग्स :AkolaअकोलाMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघ