शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

तीन वर्ष ग्रामसेवकांचे आंदोलन नाही!

By admin | Updated: April 18, 2017 01:44 IST

शासनाच्या अटीवर मिळाले २१ दिवसांचे कापलेले वेतन

अकोला : ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने १७ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचा जबर फटका ग्रामसेवकांना शासनाने दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन तर मिळालेच नाही, त्यातच तब्बल २१ दिवसांचे वेतन कपात केल्याने राज्यातील ग्रामसेवक बिथरले. ही मागणी लावून धरण्यात आली. त्यावर शासनाने कपात केलेले वेतन पुढील तीन वर्षात कोणताही संप केला जाणार नाही, या अटीवर अदा केल्याने ग्रामसेवकांचा मूलभूत अधिकारच हिसकण्याचा प्रकार शासनाने केल्याच्या प्रतिक्रिया आहेत. कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करणे, ग्रामसेवकांवरील कारवाई मागे घेणे, प्रवास भत्ता वेतनासोबतच देणे, शैक्षणिक अर्हता पदवीधर करणे, लोकसंख्येवर आधारित ग्रामसेवकांची पदनिर्मिती करणे, ग्रामसभेची संख्या मर्यादित करणे, इतर यंत्रणांच्या सभेसाठी सचिवामध्येही बदल करणे, नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करणे, वैद्यकीय सुविधा कॅशलेस करणे, विनाचौकशी फौजदारीचे परिपत्रक मागे घेणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सुधारित कामकाज तक्ता तयार करणे, ग्रामसेवक, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाणीचा गुन्हा अजामीनपात्र करणे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, युनियनचे एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्यासह ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये सात दिवसांत मुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्याकडून मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ५ डिसेंबरपासून आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र वेतन देताना तब्बल २१ दिवसांची कपात करण्यात आली. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये नाराजी होती. ती दूर करण्यासाठी कपात केलेले वेतन देण्याचा निर्णय शासनाने १५ एप्रिल रोजी घेतला आहे. आंदोलनात सहभागी होणार नसल्याची हमीग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांनी येत्या तीन वर्षांत कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाहीत. ते सहभागी झाल्यास त्या काळातील त्यांची अर्जित रजा रद्द करून वेतन कपात करण्यात येईल, असे निर्देश कपातीचे वेतन अदा करतानाच्या आदेशात देण्यात आले आहेत.