शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ट्रक— दुचाकी अपघातात तीन जण ठार

By admin | Updated: September 15, 2014 02:06 IST

बाळापूरनजीक भिकुंड नदीच्या पुलावर अपघात

अकोला : ट्रक व मोटारसायलच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरनजीक असलेल्या भिकुंड नदीच्या पुलावर रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.अकोला शहरातील आकोट फैल भागामधील पिंपळफैल येथील रहिवासी प्रेम चंद्रमनी माने (२0), अभिजित गौतम सावंत (२0), योगेश ऊर्फ गोलू धनराज मानवटर (२0) हे तीन युवक अकोल्यातील एका कॅटरिंगमध्ये कामाला होते. तिघेही कॅटरिंगच्या कामासाठी रविवारी दुपारी एमएच ३0 एएल १२६५ क्रमांकाच्या दुचाकीने पारस फाट्यावरून खामगावकडे निघाले होते. बाळापूरनजिक भिकुंड नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्‍या एम एच ३१ बी ५६७५ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात प्रेम माने, अभिजित सावंत व योगेश मानवटकर या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून तिन्ही युवकांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तीनही युवकांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच, पिंपळफैल येथील नागरिकांनी सवरेपचार रुग्णालयामध्ये गर्दी केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून, ट्रकही जप्त करण्यात आला आहे.