शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कट्यार येथे डेंग्यूचे आणखी तीन रूग्ण

By admin | Updated: November 17, 2014 01:33 IST

वातावरणातील बदल व साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती !

अकोला: वातावरणातील बदल आणि साचलेल्या पाण्यामध्ये झालेल्या डासांच्या उत्पत्तीने जिल्हय़ातील तब्बल २४७ गावांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश आजार आणि जलजन्य आजारांचे थैमान माजले आहे. यामध्ये कट्यार येथे यापूर्वीच डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असून, आता आणखी तिघे जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे गावात दहशत पसरली असून, डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांवर खासगी तर एकावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अकोला शहरासह जिल्हय़ातील २४७ गावांत डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत जवळपास १७ जणांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये १00 हून अधिक रुग्णांच्या तपासणीत डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कट्यार येथील राजाराम विठ्ठल सोळंके आणि सविता ढोरे या दोघांचा मृत्यू झाला आहे. आता आणखी तिघे पॉझिटिव्ह आढळून आले असून, भास्कर वामन नावकार (४१), राधा भीमराव घावट (१0), संकेत प्रकाश देवकार (0४), अशी त्यांची नावे आहेत. या तीनही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा प्रचंड उद्रेक झाला असताना आरोग्य विभागाने कागदोपत्रीच उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण भागात डास प्रतिबंधक धुरळणी व ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नसून, शहरातही प्रचंड घाण साचली आहे. या दोन्ही बाबींच्या परिणामी डासांची प्रचंड प्रमाणात उत्पत्ती होत आहे. त्यामुळे २४७ गावांतील प्रत्येक दोन ते तीन घरांमागे एक डेंग्यूचा रुग्ण आढळून येत आहे.