शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात तीन ठार,१० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST

पहिल्या घटनेत अंदुरा-आडसूळ मार्गावर कापसाने भरलेले मालवाहू जात असताना खड्ड्यांमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू उलटला. या अपघातात तीन ...

पहिल्या घटनेत अंदुरा-आडसूळ मार्गावर कापसाने भरलेले मालवाहू जात असताना खड्ड्यांमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू उलटला. या अपघातात तीन जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ग्राम हाता येथून कापूस घेऊन जाणारा मिनीडोअर क्रमांक एमएच ०४, जीसी ९४२० क्रमांकाचे वाहन उलटले. तळेगाव-बाभूळगाव येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून शेगावकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८, एव्ही ३२८८ दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रल्हाद अडकणे रा. दसरा नगर, शेगाव (६०) हे तर मालवाहूवरील दोण जण जागीच ठार झाले आहेत. दुसऱ्या घटनेत राष्ट्रीय महामार्गावर अकोलाहून मूर्तिजापूरकडे जाणारा कन्टेनर ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.एक्स. या वाहनाची ट्रॉली उलटली. रस्त्यावर ट्रॉली उलटल्यामुळे मूर्तिजापूरकडे जाणारी कार क्रमांक एम.एच.३० ए झेड ३९४६ व अकोल्याकडे येणारा ट्रक क्रमांक एम.एच.३६ ए.ए.२२१६ यांची समोरासमोर धडक झाली. या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र कारमधील एक जण गंभीर जखमी झाला, तर तिसऱ्या घटनेत पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.