शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

विद्यार्थ्यांवर दृष्टिदोषाचे संकट; चार महिन्यांत तीनशेच्यावर मुलांमध्ये दृष्टिदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:18 IST

अकोला : दृष्टिदोष हा केवळ प्रौढांमध्येच नव्हे, तर शाळकरी मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान झालेल्या तपासणी मोहिमेतून हे वास्तव समोर आले आहे.

- प्रवीण खेतेअकोला : दृष्टिदोष हा केवळ प्रौढांमध्येच नव्हे, तर शाळकरी मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान झालेल्या तपासणी मोहिमेतून हे वास्तव समोर आले आहे. जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३३९ विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून आला आहे. त्यामुळे पालकांनो, वेळीच सावध व्हा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.वाढत्या वयासोबतच दृष्टिदोषाची समस्या उद्भवू लागते. हे नैसर्गिक असले, तरी हल्ली झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्येही दृष्टिदोषाचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांचे बिघडलेले खानपान अन् तासंतास मोबाइल, व्हिडिओ गेम्सवर असल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागली आहे. लहान वयातच मुलांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे वेळीच निवारण व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी केली जाते. त्यांतर्गत जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ९६ शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. कार्यक्रमांतर्गत या चार महिन्यांत ३३९ विद्यार्थ्यांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले.रंग अंधत्वाची तपासणीच नाही!रंग अंधत्वाचे प्रमाण कमी असले, तरी त्याची तपासणीही आवश्यक आहे; परंतु या उपक्रमांतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांची रंग अंधत्वाची तपासणीच केली जात नाही.तिरळेपणाचेही लक्षणतपासणीदरम्यान लहान मुलांमध्ये दृष्टी कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यासोबतच तिरळेपणाची समस्याही वाढत आहे. उपक्रमांतर्गत गतवर्षी काही रुग्णांवर वर्धा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.जेवणात याचा समावेश करा!हिरव्या पालेभाज्याफळंअंडीमच्छीपालकांची जबाबदारीखानपानासोबतच मुलांच्या जीवनशैलीवरदेखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखून मुलांच्या हाती जास्त वेळ मोबाइल देणे टाळावे, फास्ट फुडपेक्षा पालेभाज्या द्या, अभ्यास करताना मुले चुकीच्या पद्धतीने बसत असतील, तर ती तत्काळ बदला, मुलांकडून नियमित व्यायाम करून घ्यावा.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून आले. पालकांनी विशेष खबरदारी घेतल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते.- डॉ. एम. राठोड, आरएमओ, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी