शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरांच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण

By admin | Updated: July 4, 2014 00:44 IST

अनेक गावांत चोरटे सक्रि य असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले

लोहगड: ग्रामीण भागातील अनेक गावांत चोरटे सक्रि य असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याने बाश्रीटाकळी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांची टोळीच फिरत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेमुळे महिला वर्गांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच दगडपारवा, पुनोती, तिवसा आदी गावांत चोरांची टोळी आल्याची वार्ता पसरली होती. यामुळे संपूर्ण बाश्रीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झाले. गत दोन दिवसांपूर्वी लोहगड येथेही चोरांची टोळी दाखल झाल्याच्या अफवेने ग्रामस्थ घाबरून गेले होते. चोरांच्या भीतीपोटी ग्रामस्थ रात्रभर जागरण करीत आहेत. उल्लेखनीय बाब अशी, की तालुक्यातील ग्रामीण भागात चोरटे सक्रिय असल्याच्या वार्ता कानावर येत असल्या तरी, कोण्याही ठिकाणी लुटमार, दरोडा, चोरी झाल्याची एकही तक्रार तालुक्यातील एकाही पोलिस स्टेशनला दाखल झालेली नाही. त्यावरून तालुक्यात चोरांची टोळी सक्रिय असल्याची वार्ता ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होत आहे. ही अफवा असली तरी, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाही पोलिस प्रशासन मात्र त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)