शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान!

By admin | Updated: April 13, 2017 01:57 IST

वन विभागाची मदत: शेतकऱ्यांना १ कोटी १७ लाख रुपयांची नुकसानभरपाई

नितीन गव्हाळे - अकोलामानवाकडून विकासाच्या नावाखाली होत असलेली बेसुमार वृक्षतोड. कमी होत असलेले वनक्षेत्र तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई, यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जात असताना मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. २0१६-१७ वर्षांमध्ये ३ हजार २५८ शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले असून, त्याची नुकसानभरपाई म्हणून वन विभागातर्फे १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे.वन्य प्राण्यांमुळे शेतातील पीक किंवा फळबागांचे नुकसान झाल्यास उत्पादकाला वन विभागाकडून दुपटीने नुकसानभरपाईची रक्कम दिली जाते. पिकांच्या नुकसानापोटी दहा हजारांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच दहा हजारांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्यास ८0 टक्के रक्कम देय असून, त्याची कमाल मर्यादा २५ हजार इतकी करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी ९४८.५५ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान केले. या नुकसानापोटी ३२५८ शेतकऱ्यांना ७२ लाख ९७ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. मानवी वस्तीवर हल्ले वाढले! जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्या, माकड यासह वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यातून शेळी व मेंढ्यांसह गुरे व ढोरांवर तसेच मानवावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरी वस्तीत माकडांचादेखील मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यानंतर वन विभागातर्फे हल्ला झालेल्या व्यक्तीला भरपाई देण्यात येत असते. त्यानुसार वनरक्षक, कृषी अधिकारी व सरपंच हे संयुक्तपणे पंचनामा करीत असतात. पंचनामा विभाग स्तरावर पाठविण्यात येतो. आॅनलाइन फिडिंग झाल्यानंतर त्यावर उपविभागात मंजुरी मिळाल्यानंतर नुकसानभरपाई देण्यात येते.शेतीक्षेत्राचे सर्वाधिक नुकसान जंगलात पिण्यासाठी पाणी व अन्न नसल्याने हरीण, नीलगायी तसेच रानडुक्कर हे शेती क्षेत्राकडे धाव घेत आहेत. जिल्ह्यात कपाशी व केळीचे क्षेत्र जास्त आहे. त्यापाठोपाठ, कडधान्य, ऊस, भुईमुगाची शेती करण्यात येत असते. नीलगायी तसेच रानडुक्कर यांच्याकडून कपाशी व भुईमुगाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. जंगलक्षेत्राच्या जवळ असलेल्या शेतातील पिकांचे संपूर्ण क्षेत्र वन्य प्राण्यांकडून नष्ट केले जात आहेत.वन्य प्राण्यांनी शेतीपिकांचे नुकसान केल्याच्या, हल्ला केल्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. उपवनसंरक्षक प्र.ज. लोणकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून यंदा तीन हजारांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. - गोविंद पांडे, वन्य जीव शाखाप्रमुख, वन विभाग