शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान!

By admin | Updated: April 13, 2017 01:57 IST

वन विभागाची मदत: शेतकऱ्यांना १ कोटी १७ लाख रुपयांची नुकसानभरपाई

नितीन गव्हाळे - अकोलामानवाकडून विकासाच्या नावाखाली होत असलेली बेसुमार वृक्षतोड. कमी होत असलेले वनक्षेत्र तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई, यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जात असताना मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. २0१६-१७ वर्षांमध्ये ३ हजार २५८ शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले असून, त्याची नुकसानभरपाई म्हणून वन विभागातर्फे १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे.वन्य प्राण्यांमुळे शेतातील पीक किंवा फळबागांचे नुकसान झाल्यास उत्पादकाला वन विभागाकडून दुपटीने नुकसानभरपाईची रक्कम दिली जाते. पिकांच्या नुकसानापोटी दहा हजारांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच दहा हजारांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्यास ८0 टक्के रक्कम देय असून, त्याची कमाल मर्यादा २५ हजार इतकी करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी ९४८.५५ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान केले. या नुकसानापोटी ३२५८ शेतकऱ्यांना ७२ लाख ९७ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. मानवी वस्तीवर हल्ले वाढले! जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्या, माकड यासह वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यातून शेळी व मेंढ्यांसह गुरे व ढोरांवर तसेच मानवावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरी वस्तीत माकडांचादेखील मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यानंतर वन विभागातर्फे हल्ला झालेल्या व्यक्तीला भरपाई देण्यात येत असते. त्यानुसार वनरक्षक, कृषी अधिकारी व सरपंच हे संयुक्तपणे पंचनामा करीत असतात. पंचनामा विभाग स्तरावर पाठविण्यात येतो. आॅनलाइन फिडिंग झाल्यानंतर त्यावर उपविभागात मंजुरी मिळाल्यानंतर नुकसानभरपाई देण्यात येते.शेतीक्षेत्राचे सर्वाधिक नुकसान जंगलात पिण्यासाठी पाणी व अन्न नसल्याने हरीण, नीलगायी तसेच रानडुक्कर हे शेती क्षेत्राकडे धाव घेत आहेत. जिल्ह्यात कपाशी व केळीचे क्षेत्र जास्त आहे. त्यापाठोपाठ, कडधान्य, ऊस, भुईमुगाची शेती करण्यात येत असते. नीलगायी तसेच रानडुक्कर यांच्याकडून कपाशी व भुईमुगाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. जंगलक्षेत्राच्या जवळ असलेल्या शेतातील पिकांचे संपूर्ण क्षेत्र वन्य प्राण्यांकडून नष्ट केले जात आहेत.वन्य प्राण्यांनी शेतीपिकांचे नुकसान केल्याच्या, हल्ला केल्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. उपवनसंरक्षक प्र.ज. लोणकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून यंदा तीन हजारांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. - गोविंद पांडे, वन्य जीव शाखाप्रमुख, वन विभाग