शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:32 IST

विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

संतोष येलकर,अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यासाठी राज्यात शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. विशेष मोहिमेच्या पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांकडून अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना लवकरच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात येणार आहे.७२०८ अर्जांची पडताळणी पूर्ण!अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या २७ हजार ४२७ अर्जांची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी २ आॅगस्टपर्यंत ७ हजार २०८ अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न-धान्याचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ आॅगस्टपर्यंत लाभार्थ्यांकडून २७ हजार ४२७ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पडताळणीनंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न -धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.-बी.यू.काळेजिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना