शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:32 IST

विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

संतोष येलकर,अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यासाठी राज्यात शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. विशेष मोहिमेच्या पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांकडून अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना लवकरच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात येणार आहे.७२०८ अर्जांची पडताळणी पूर्ण!अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या २७ हजार ४२७ अर्जांची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी २ आॅगस्टपर्यंत ७ हजार २०८ अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न-धान्याचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ आॅगस्टपर्यंत लाभार्थ्यांकडून २७ हजार ४२७ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पडताळणीनंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न -धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.-बी.यू.काळेजिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना