शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:32 IST

विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

संतोष येलकर,अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यासाठी राज्यात शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. विशेष मोहिमेच्या पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांकडून अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना लवकरच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात येणार आहे.७२०८ अर्जांची पडताळणी पूर्ण!अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या २७ हजार ४२७ अर्जांची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी २ आॅगस्टपर्यंत ७ हजार २०८ अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न-धान्याचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ आॅगस्टपर्यंत लाभार्थ्यांकडून २७ हजार ४२७ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पडताळणीनंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न -धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.-बी.यू.काळेजिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना