शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

महात्मा बसवेश्वरांचे विचार विश्वाचा आरसा : सिद्लिंग शिवाचार्य स्वामी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 15:51 IST

मलकापूर येथे लिंगदिक्षा संस्कार, गुरूमंत्र आणि प्रवचन कार्यक्रमाला सुरूवात झाली.

अकोला :      जगातील अनेक देशांच्या संविधानाचा गाभा हा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांवर आधारीत आहे. महात्मा बसवेश्वरांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजसुधारणेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून प्रवाहीत केला. याच विचारांवर लिंगायत धर्म उभा राहिल्याचं प्रतिपादन बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठाचे मठाधिपती सिद्लिंग शिवाचार्य स्वामी महाराज यांनी केलं. ते अकोला येथे २५ ऑगस्टला पार पडलेल्या लिंगायत समाजाचा लिंगदिक्षा आणि संस्कार कार्यक्रमातील प्रवचनाचे पुष्प गुंफतांना बोलत होते. हा कार्यक्रम अकोल्यातील मलकापूर भागातील बसवेश्वर चौकातल्या गवळी मंगल कार्यालयात झाला. यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष महेश आप्पा शेटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विश्वनाथ आप्पा हजारे,  ॲड. नितीन आप्पा गवळी, केशवआप्पा बिडवे, रामभाऊआप्पा शेटे, मनोहरआप्पा गवळी, आप्पासाहेब बिडकर  उपस्थित होते. महाराष्ट्र विरशैव सभा आणि महात्मा बसवेश्वर स्मारक समितीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं.

               २५ ऑगस्टला सकाळी मलकापूर येथे लिंगदिक्षा संस्कार, गुरूमंत्र आणि प्रवचन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी शेकडो लिंगायत बाधवांनी सिद्लिंग शिवाचार्य स्वामींच्या हस्ते लिंगदिक्षा घेतली. दुपारच्या सत्रात त्यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मुर्तीजापुरचे आमदार हरीश पिंपळे, नगरसेवक मंगेश काळे यांनी भेटी दिल्यात. 

   २४ ऑगस्टला स्वामीजींचं आगमन झाल्यानंतर दुपारी अंबिकानगर येथून मलकापूरपर्यंत त्यांची स्वागत मिरवणूक आणि कलशयात्रा काढण्यात आली. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यानंतर संध्याकाळी गवळी मंगल कार्यालयात स्वामी महाराजांचं प्रवचन झालं.  २५ ऑगस्टच्या लिंगदिक्षा, गुरूमंत्र कार्यक्रमासाठी विदर्भातील अनेक शहरांसह मध्यप्रदेशातूनही समाजबांधव आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शेटे, ॲड. नितीन गवळी, उमेश अलोणे, सुरेश भागानगरे, राजेश यमगवळी, सुनील डहाके, अजय रुईकर, विलास घुले, आप्पा चुकेवार, आप्पा एकघरे, भास्कर घाटे, सुनील शिरोडकर, सुरज सरजने, नितीन थळकर भारत कारंजकर, संजय बाल्टे, सुरेश सोसे, मनोहर गवळी यांच्यासह सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :Akolaअकोला