शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:36 IST

जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली असताना अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. आता शुक्रवारपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.यावर्षी सप्टेंबर महिन्यात काटेपूर्णा धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. आजमितीस ५४.३७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. त्यामुळे अकोलेकरांवरील पाणी संकट टळले आहे. जिल्ह्यातील इतरही धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वान धरणाचा जलसाठा आजमितीस ८१.१५ दलघमी, १०० टक्के आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २८.८५ दलघमी, १०० टक्के, याच तालुक्यातील मोर्णा धरणात ३०.८७ दलघमी, ७४.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ७.५६ दलघमी, ६४.६३ टक्के तर घुंगशी बॅरेजमध्ये १५.३२ दलघमी ८८.७१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरण वगळता इतर सर्वच धरणांतून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण