शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:11 AM

अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. 

ठळक मुद्देपातूर तालुका १४,१६४ हेक्टरमधील सकल कृषी उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. पातूर तालुक्यात एकूण पाटबंधारे विभागाचे नऊ मध्यम व लघू सिंचन प्रकल्प आहेत. रब्बीच्या हंगामासाठी सिंचन प्रकल्पमधून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून पाटसर्‍याच्या माध्यमातून पोहोचणार्‍या पाण्यावर २४ हजारांहून अधिक शेतकरी गहू, हरभरा ही पिके रब्बीत दरवर्षी घेत असतात. यावर्षी मोर्णा प्रकल्प ७.४ दशलक्ष घनमीटर (१६.९८टक्के), निगुर्णा प्रकल्प १७.४६ द.ल.घ.मी. (६0.५१टक्के), सध्या पारस औष्णिक वीज प्रकल्प आणि शेगाव संस्थान एकूण १२.४८ द.ल.घ.मी. शासकीय आरक्षण, तुळजापूर 0.२९७ द.ल.घ.मी. (३४.१८टक्के), गावंडगाव 0.00 (0.00टक्के), सावरगाव 0.0५४ द.ल.घ.मी. (४.७९ टक्के), पातूर तलाव 0.६६५ द.ल.घ.मी. (३५.८८टक्के), विश्‍वमित्री प्रकल्प ३.२५ द.ल.घ.मी. (३२.५१टक्के), संग्राहक तलाव झरंडी 0.४१६ द.ल.घ.मी. (२३.१६टक्के) व हिवरा तलाव 0.२३८ द.ल.घ.मी. (१0.३८ टक्के) एवढीच पाण्याची पातळी आहे.यावर्षी पातूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांनी खरिपातील अवर्षणप्रवणतेने हवालदिल झाल्यानंतर नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची संपूर्ण तयारी मोठय़ा जिकरीने पूर्ण केली होती. मात्र, सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने मोठे संकट शेतकर्‍यांवर कोसळले आहे. पातूर तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पावसाची हजेरी असते मात्र ह्यावर्षी ४00 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनचे पीक हातातून गेले. उत्पादन खर्चही निघाला नाह. मात्र, शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शेतकर्‍यांना अद्यापपयर्ंत केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून खरिपातील अवर्षणप्रवणतेने झालेल्या नुकसानाची भरपाई भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची केलेली संपूर्ण तयारी वाया गेली आहे. 

पातूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे, सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी कोणत्याही प्रकल्पात नाही - अत्तरकार, शाखा अभियंता, सिंचन विभाग पातूर                             पातूर तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पावरील यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियोजन सभा रद्द करण्यात आली आहे. - अनिल राठोड,  उप अभियंता सिंचन शाखा अकोला 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण