शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

‘जलजीवन मिशन’! १ हजार २८ कोटींची कामे रेंगाळली; ५२३ गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी?

By संतोष येलकर | Updated: June 25, 2024 15:53 IST

जिल्ह्यात १५ प्रादेशिक योजनांची कामे निम्म्यावरच

अकोला : ‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली १ हजार २८ कोटी रुपये किमतीची १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप निम्म्यावरच आहेत. त्यामुळे रेंगाळलेली कामे पूर्ण होणार केव्हा आणि प्रत्यक्षात योजनांद्वारे ५२३ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत दरडोई दर दिवसाला ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी संस्था आणि गुरांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११ नवीन आणि ४ सुधारणात्मक पुनर्जोडणी अशा १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली. १ हजार २८ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या या योजनांची कामे गेल्या मे ते डिसेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली. संबंधित योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील या पाणीपुरवठा योजनांची कामे सरासरी ५० टक्क्यापर्यंत पोहोचली असून, उर्वरित ५० टक्के कामे अद्याप बाकी असल्याने, या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.कामे सुरू असलेल्या अशा आहेत१५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना !बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजना.तेल्हारा ६९ गावे पाणीपुरवठा योजना.पोपटखेड ९७ गावे पाणीपुरवठा योजना.अकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजना.लंघापूर ५० गावे पाणीपुरवठा योजना.लाखपुरी १८ गावे पाणीपुरवठा योजना.कुरुम आणि दोन गावे पाणीपुरवठा योजना.पिंजर व दोन गावे पाणीपुरवठा योजना.धाबा आणि १३ गावे पाणीपुरवठा योजना.कान्हेरी व १० गावे पाणीपुरवठा योजना.वाडेगाव आणि २४ गावे पाणीपुरवठा योजना.खांबोरा ६० खेडी पाणीपुरवठा योजना.खांबोरा ४ खेडी पाणीपुरवठा योजना.शिरपूर आणि १२ गावे पाणीपुरवठा योजना.बागायत पातूर व २ गावे पाणीपुरवठा योजना.

जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागिरांची वानवा !जिल्ह्यातील १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागीर अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, कुशल करागिरांची वानवा असल्याने, योजनांच्या जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्रांची कामे रेंगाळली आहेत.

‘डीआय पाइप’चा तुटवडा !प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या डीआय पाइपचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. या पाइपचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीपुरवठा योजनांची रेंगाळत आहेत.