शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

‘जलजीवन मिशन’! १ हजार २८ कोटींची कामे रेंगाळली; ५२३ गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी?

By संतोष येलकर | Updated: June 25, 2024 15:53 IST

जिल्ह्यात १५ प्रादेशिक योजनांची कामे निम्म्यावरच

अकोला : ‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली १ हजार २८ कोटी रुपये किमतीची १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप निम्म्यावरच आहेत. त्यामुळे रेंगाळलेली कामे पूर्ण होणार केव्हा आणि प्रत्यक्षात योजनांद्वारे ५२३ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत दरडोई दर दिवसाला ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी संस्था आणि गुरांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११ नवीन आणि ४ सुधारणात्मक पुनर्जोडणी अशा १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली. १ हजार २८ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या या योजनांची कामे गेल्या मे ते डिसेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली. संबंधित योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील या पाणीपुरवठा योजनांची कामे सरासरी ५० टक्क्यापर्यंत पोहोचली असून, उर्वरित ५० टक्के कामे अद्याप बाकी असल्याने, या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.कामे सुरू असलेल्या अशा आहेत१५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना !बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजना.तेल्हारा ६९ गावे पाणीपुरवठा योजना.पोपटखेड ९७ गावे पाणीपुरवठा योजना.अकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजना.लंघापूर ५० गावे पाणीपुरवठा योजना.लाखपुरी १८ गावे पाणीपुरवठा योजना.कुरुम आणि दोन गावे पाणीपुरवठा योजना.पिंजर व दोन गावे पाणीपुरवठा योजना.धाबा आणि १३ गावे पाणीपुरवठा योजना.कान्हेरी व १० गावे पाणीपुरवठा योजना.वाडेगाव आणि २४ गावे पाणीपुरवठा योजना.खांबोरा ६० खेडी पाणीपुरवठा योजना.खांबोरा ४ खेडी पाणीपुरवठा योजना.शिरपूर आणि १२ गावे पाणीपुरवठा योजना.बागायत पातूर व २ गावे पाणीपुरवठा योजना.

जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागिरांची वानवा !जिल्ह्यातील १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागीर अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, कुशल करागिरांची वानवा असल्याने, योजनांच्या जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्रांची कामे रेंगाळली आहेत.

‘डीआय पाइप’चा तुटवडा !प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या डीआय पाइपचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. या पाइपचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीपुरवठा योजनांची रेंगाळत आहेत.