शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

वंचित-रिपाइं एकत्र आल्यास महाराष्ट्राचे राजकारण बदलणार!

By संतोष येलकर | Updated: January 15, 2024 21:43 IST

रामदास आठवले यांचा बाळासाहेब आंबेडकर यांना टाळी देण्याचा प्रयत्न

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एकत्र येण्याची गरज असून, आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्राचे राजकारण बदलणार असून, राज्याचा मुख्यमंत्री आमचा झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना टाळी देण्याचा प्रयत्न सोमवारी अकोल्यात केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून, त्यांचा मला आदर आहे. मागासवर्गीय, ओबीसी, बहुजन अशा वेगवेगळ्या घटकांसाठी लढा देत त्यांना एकत्र करण्याचे कार्य बाळासाहेब आंबेडकर करीत असल्याचे गौरवोद्गार काढत आम्ही सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. चळवळ मजूबत करायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिपाइं (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेला पक्षाचे प्रदेश संघटन सचिव अशोक नागदेवे, सुमित वजाडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, जिल्हा महासचिव जे.पी. सावंग, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश बनसोड, महेंद्र मानकर, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आकाश हिवराळे यांनी केले.

अकोला जिल्हा पुन्हा रिपब्लिकनमय करायचा आहे!दलित पँथरच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात अनेक आंदोलने करण्यात आली होती. आम्हाला पुन्हा हा जिल्हा रिपब्लिकनमय करायचा आहे, असा निर्धार रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखविला. अकोला जिल्ह्यात ‘जय भीम’चा नारा बुलंद करणारे कार्यकर्ते असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांच्या संविधानाला कोणालाही हात लावता येणार नाही !महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणालाही हात लावता येणार नाही. संविधान बदलणे शक्य नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत भीमशक्ती संविधान बदलू देणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.२२ जानेवारीला अयोध्येला जाणार !

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून, आपण अयोध्येला जाणार असल्याचे सांगत, बुद्धविहारांमध्ये स्वच्छतेची कामे राबविण्याचे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर