शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा चटका आणि महावितरणचा फटका; १४३ हेक्टर वरील सोयाबीन होरपळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2022 16:47 IST

Murtijapur News : उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित.

-संजय उमक  

मूर्तिजापूर : उन्हाळी सोयाबीन उत्पादनाचा कधीच न झालेला प्रयोग यावर्षी शेतकऱ्यांनी केला. यासाठी संबंधित कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. तिसरे पिक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने लागवड पण केली. परंतु झाले उलटेच वरुन उन्हाचा चटका व महावितरणच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ धुपाटणे आले.        तालुक्यात नगदी पीक म्हणून यावर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीन पिक घेण्यात येत आहे,  पुरेसा जलसाठा असल्याने या वर्षी रब्बी हंगामात गहु, हरबरा, भाजीपाला आणि टरबूज खरबूज  पिकांबरोबर उन्हाळी सोयाबीन पिकाला प्राधान्य देण्यात  आले आहे. खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिक घेतले जाते, हंगामाच्या शेवटी अवकाळीपावसाने शेतकरी अडचणीत येतो, सोयाबीन बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून यावर्षी उन्हाळी सोयाबीन पिक वाण विकसित करून लागवडीसाठी कृषि विभाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन १४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. पाण्याच्या उपलब्धतेनुसार  शेतकर्‍यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवडही केली परंतू  वीजपुरवठा अनियमित असल्याने पुरेसे पाणी पिकांना देणे शक्य झाले नाही, त्यातच उन्हाच्या चटक्याने, पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेतच होरपळून केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने  खरीपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी हंगामात तालुक्यातील १४३ हेक्टर क्षेत्रावर मुख्यत्वे जेएस- ३३५, फुले संगम, एमएयुएस- १५८, एमएयुएस- १६२ या वाणांची पेरणी करण्यात आली. सोयाबीन पिकाचे वाढते दर व खरीप हंगाम मध्ये आवश्यक सोयाबीन बियाणे उपलब्ध रहावे ह्या बाबी लक्षात घेऊन, ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यामध्ये ओलीताची व्यवस्था आहे, त्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात तिसरे पीक घेण्याकरिता कृषी विभागाने प्रवृत्त केले. मात्र उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित. मागच्या वर्षी उन्हाळी सोयाबीन क्षेत्र नगण्य असणारे या वर्षी १४३ हेक्टर पर्यंत गेले आहे. सोयाबीन काढणी पासून ग्राम बिजोत्पादन च्या माध्यमातून जे शेतकरी घरचे सोयाबीन खरीप हंगाम करिता पेरणार आहेत प्रत्येक गावामध्ये सोयाबीन उगवण क्षमता तपासणी सुरु आहे. शिफारशी पेक्षा कमी उगवण क्षमता आलेले बियाणे म्हणूण उपयोग करू नये या बाबत जागृती करणे सुरु आहे. उन्हाळी सोयाबीन दर्जेदार असेल व उगवण क्षमता चांगली असेल तर खरीप हंगामात बियाणे म्हणूण वापण्यास हरकत नाही. -अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेतीFarmerशेतकरी