शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

उन्हाचा चटका आणि महावितरणचा फटका; १४३ हेक्टर वरील सोयाबीन होरपळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2022 16:47 IST

Murtijapur News : उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित.

-संजय उमक  

मूर्तिजापूर : उन्हाळी सोयाबीन उत्पादनाचा कधीच न झालेला प्रयोग यावर्षी शेतकऱ्यांनी केला. यासाठी संबंधित कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. तिसरे पिक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने लागवड पण केली. परंतु झाले उलटेच वरुन उन्हाचा चटका व महावितरणच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ धुपाटणे आले.        तालुक्यात नगदी पीक म्हणून यावर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीन पिक घेण्यात येत आहे,  पुरेसा जलसाठा असल्याने या वर्षी रब्बी हंगामात गहु, हरबरा, भाजीपाला आणि टरबूज खरबूज  पिकांबरोबर उन्हाळी सोयाबीन पिकाला प्राधान्य देण्यात  आले आहे. खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिक घेतले जाते, हंगामाच्या शेवटी अवकाळीपावसाने शेतकरी अडचणीत येतो, सोयाबीन बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून यावर्षी उन्हाळी सोयाबीन पिक वाण विकसित करून लागवडीसाठी कृषि विभाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन १४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. पाण्याच्या उपलब्धतेनुसार  शेतकर्‍यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवडही केली परंतू  वीजपुरवठा अनियमित असल्याने पुरेसे पाणी पिकांना देणे शक्य झाले नाही, त्यातच उन्हाच्या चटक्याने, पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेतच होरपळून केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने  खरीपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी हंगामात तालुक्यातील १४३ हेक्टर क्षेत्रावर मुख्यत्वे जेएस- ३३५, फुले संगम, एमएयुएस- १५८, एमएयुएस- १६२ या वाणांची पेरणी करण्यात आली. सोयाबीन पिकाचे वाढते दर व खरीप हंगाम मध्ये आवश्यक सोयाबीन बियाणे उपलब्ध रहावे ह्या बाबी लक्षात घेऊन, ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यामध्ये ओलीताची व्यवस्था आहे, त्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात तिसरे पीक घेण्याकरिता कृषी विभागाने प्रवृत्त केले. मात्र उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित. मागच्या वर्षी उन्हाळी सोयाबीन क्षेत्र नगण्य असणारे या वर्षी १४३ हेक्टर पर्यंत गेले आहे. सोयाबीन काढणी पासून ग्राम बिजोत्पादन च्या माध्यमातून जे शेतकरी घरचे सोयाबीन खरीप हंगाम करिता पेरणार आहेत प्रत्येक गावामध्ये सोयाबीन उगवण क्षमता तपासणी सुरु आहे. शिफारशी पेक्षा कमी उगवण क्षमता आलेले बियाणे म्हणूण उपयोग करू नये या बाबत जागृती करणे सुरु आहे. उन्हाळी सोयाबीन दर्जेदार असेल व उगवण क्षमता चांगली असेल तर खरीप हंगामात बियाणे म्हणूण वापण्यास हरकत नाही. -अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेतीFarmerशेतकरी