शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त! शेतकऱ्यांना दिलासा

By रवी दामोदर | Updated: April 17, 2023 16:41 IST

दहाही केंद्रावर पुन्हा खरेदी सुरळीत

रवी दामोदर, अकोला: केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, गत दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तसुद्धा प्रकाशित करीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. रविवार, दि. १६ एप्रिल रोजी जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त झाल्याने खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रूपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांकडून नाफेडद्वारा शेतमाल खरेदी सुरू होती; मात्र दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. ऐन खरीप हंगामाची तयारी तोंडावर असताना नाफेडद्वारा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. खरेदी पूर्ववत होण्यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आले होते. रविवारी जिल्ह्याला १२० गाठी प्राप्त झाल्या असून, दहाही केंद्रावर खरेदी पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.

१ गाठीत असतात ५०० कट्टे

जिल्ह्यात नाफेड केंद्रावर बारदान्याअभावी खरेदी थांबली होती. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बारदाना कलकत्ता येथून निघाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, बारदान्याच्या गाठी घेऊन दोन ट्रक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रविवारपासूनच खरेदी केंद्रावर खरेदी सुरळीत करण्यात आली आहे. एका गाठीमध्ये ५०० कट्टे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, जिल्ह्याला तब्बल ६० हजार कट्टे प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :Akolaअकोला