शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त! शेतकऱ्यांना दिलासा

By रवी दामोदर | Updated: April 17, 2023 16:41 IST

दहाही केंद्रावर पुन्हा खरेदी सुरळीत

रवी दामोदर, अकोला: केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, गत दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तसुद्धा प्रकाशित करीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. रविवार, दि. १६ एप्रिल रोजी जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त झाल्याने खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रूपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांकडून नाफेडद्वारा शेतमाल खरेदी सुरू होती; मात्र दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. ऐन खरीप हंगामाची तयारी तोंडावर असताना नाफेडद्वारा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. खरेदी पूर्ववत होण्यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आले होते. रविवारी जिल्ह्याला १२० गाठी प्राप्त झाल्या असून, दहाही केंद्रावर खरेदी पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.

१ गाठीत असतात ५०० कट्टे

जिल्ह्यात नाफेड केंद्रावर बारदान्याअभावी खरेदी थांबली होती. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बारदाना कलकत्ता येथून निघाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, बारदान्याच्या गाठी घेऊन दोन ट्रक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रविवारपासूनच खरेदी केंद्रावर खरेदी सुरळीत करण्यात आली आहे. एका गाठीमध्ये ५०० कट्टे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, जिल्ह्याला तब्बल ६० हजार कट्टे प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :Akolaअकोला